बेणसे | मासेमारी बंदीच्या काळात मच्छिमारांना शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी कोकण किनारा मच्छीमार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन कोकण विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. विशेषतः १ जून ते १५ ऑगस्ट २०२६ या मासेमारी बंदी कालावधीत मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्याची प्रमुख मागणी संघटनेने केली आहे.
माणगाव | माणगाव तालुक्यातील कुंभे केळगण घाट, कुंभे धरण आणि कुंभे बोगदा परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
अलिबाग | अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीदरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नवजात बालकाच्या मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर प्रियल शेंडे यांच्याविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या पाच वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
कोर्लई | मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीतील पाच सदस्यांना निवडणूक खर्चाचा हिशेब विहित मुदतीत सादर न केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी, रायगड यांनी अपात्र (निरर्ह) ठरविले आहे. या सदस्यांना पुढील पाच वर्षे कोणतेही सदस्यपद धारण करता येणार नाही.
अलिबाग | रायगड जिल्ह्यात औद्योगिक, क्लस्टर विकास तसेच गृहनिर्माण प्रकल्पांसाठी अनेक वर्षांपूर्वी संपादीत करण्यात आलेल्या, मात्र अद्याप विकास न झालेल्या जमिनींची फेरतपासणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील चरी मंडळ अधिकारी यांना पोयनाड पोलिसांनी केलेल्या अटकेविरोधात रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अटकेची कारवाई बेकायदा असल्याचा आरोप करत महसूल कर्मचारी संघटनेने शनिवारी ‘लेखणी बंद आंदोलन’ केले तर आज सोमवारी (२७ जुलै) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा येणार आहे.
अलिबाग | सायबर फसवणुकीसाठी म्यूल बँक खात्यांचा वापर केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा आणि नागोठणे पोलीस ठाण्यांत स्वतंत्र तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कर्जत | गेली तीन दिवस नेरळ गाव आणि परिसरात वीजपुरवठा खंडित झाली होती. त्यामुळे नागरीक चांगलेच त्रस्त झाले आहेत. शेवटी वीज ग्राहकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे नेरळ येथे पोहचले.
पाली | सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वीज अचानक गेल्याने, मोबाईलच्या टॉर्चवर एका महिलेची प्रसूती करण्याची वेळ डॉक्टरांवर आली. वैद्यकीय पथकाने कौशल्य पणाला लावून महिलेची यशस्वी प्रसुती केली. आई व बाळ दोन्ही सुखरुप आहेत.
रोहा | मुसळधार पावसामुळे आणि भिरा जलविद्युत प्रकल्पातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे रोहा-अष्टमी शहर पुराच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल तीन वेळा पुराचे पाणी शहरात व नदीकाठच्या गावांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
अलिबाग | कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे चांगलेच सक्रिय झाल्याने रायगड जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अलिबाग तालुक्यातील देहेन गावाजवळ असलेल्या बंधार्याला मोठे भगदाड पडून तो वाहून गेला आहे.
कोर्लई | मुरुड-सुपेगाव-रोहा मार्गावरील सुपेगाव परिसरात रस्त्यालगतची झाडे आणि झुकलेल्या फांद्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. रस्त्यावर खाली आलेल्या फांद्या तसेच वाढलेल्या झुडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
माणगाव । जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक पाण्यात वाहून जाऊन बेपत्ता झाल्याची घटना रविवारी (12 जुलै) दुपारी घडली. घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि कोलाड येथील बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र उशिरापर्यंत दोघांचा शोध लागला नव्हता.
रोहा | रोहा-अष्टमी नगरपरिषदेत प्रशासन आणि नगरसेवक यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. घरकुल योजनेतील एका लाभार्थ्याला वापर परवाना देण्यास विलंबावरुन नगरसेवक महेश कोलाटकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारला. यावेळी झालेल्या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
श्रीवर्धन | राज्यात महावितरणकडून सुरु असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला विरोध दर्शवत श्रीवर्धनमध्ये शेकापने तहसीलदार तसेच महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात निवेदन दिले आले. स्मार्ट मीटर बसविणे ऐच्छिक ठेवावे, ग्राहकांवरील सक्ती थांबवावी आणि वाढीव वीजबिले माफ करावीत, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
बोर्लीपंचतन | श्रीवर्धन तालुक्यातील दिघी खाडीत थरारक घटना समोर आली आहे. या खाडीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांची फायबरची डिंगी मुसळधार पाऊस आणि वादळी वार्यामुळे अचानक पलटी झाली. ‘दिघी क्वीन’ जंगल जेट्टीचे चालक बाळकृष्ण पाटील यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत तिघांचा जीव वाचवला.
म्हसळा | म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शिवसेना शिंदे गटाने अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील शेडगे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादीने जल्लोष केला. मात्र आठ दिवसांपूर्वी फटाके फोडणार्या शिवसेनेच्या गोटात सन्नाटा पसरल्याचे चित्र आहे.
म्हसळा | म्हसळा शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगणार आहे. काही दिवसांपूर्वी चार दिवस नगराध्यक्ष राहिल्यानंतर शाहिद जंजिरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी पुन्हा निवडणूक जाहीर झाली असून १ जून रोजी मतदान आणि निकाल होणार आहे.
पेण | गेल्या महिन्यापर्यंत गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा करणार्या नागरिकांना बुधवारी एक वेगळेच दृश्य पहायला मिळाले. पातळगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीच्या प्रवाहात हजारो एलपीजी गॅस सिलेंडर वाहत येत असल्याचे दिसताच महापुराची भीती विसरुन अनेकांनी ते पकडण्यासाठी नदीत उड्या मारल्या, तर काही जण होड्यांच्या सहाय्याने सिलेंडर गोळा करताना दिसले.
बेणसे | अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे वाकण आणि वजरोली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या तब्बल २८ नागरिकांची रेस्क्यू पथकाने धाडसी बचाव मोहीम राबवत सुखरूप सुटका केली. रेस्क्यू टीमचे सदस्य सागर दहिंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वजरोली गावाजवळ काही बंगल्यांचे बांधकाम सुरू होते.
पनवेल | कामोठे सेक्टर-२१ परिसरात गेल्या आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. चार दिवसांत जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेकापचे पनवेल महानगर जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कुंडलिक वाघमारे यांनी दिला यासंदर्भात महादेव वाघमारे यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नवी मुंबई यांना निवेदन सादर करून सेक्टर-२१ मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
मुंबई | पनवेल शहरातील वाढत्या पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासन सकारात्मक असून, शिलार धरण प्रकल्पासह विविध पाणीपुरवठा योजनांना गती देण्यात येत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य विक्रांत पाटील यांनी म.वि.प. नियम ९७ अन्वये या विषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थितीत केली होती.
कर्जत | महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात जाऊन महाड नगरपरिषदेचे नगरसेवक सूरज बामणे व इतर साथीदारांनी हल्ला करून मारहाण केली होती.
खालापूर | शेकापचा वर्धापन दिन सोहळा यावर्षी खालापूर येथे होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी होणार्या या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला वेग आला असून, तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी केले आहे.
खोपोली | खालापूर तालुक्यातील निगडोली गावात ७५ वर्षीय वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२६ मे) उघडकीस आली. या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे.
उरण | उरण ते मोरा मार्गावरील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर सोमवारी (दि.१) पहाटे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातस्थळी स्पीड बे्रकर बसविण्याची मागणी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
उरण | काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य डॉ.मनीष पाटील यांच्या नियुक्तीनंतर, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
महाड | महाड शहरातील मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेदरम्यान बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) शिक्षिकेला एका इसमाने धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी महाड शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड | महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात घुसून झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी गुरुवारी (९ जुलै) सलग दुसर्या दिवशीही कामबंद आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला.
पोलादपूर | सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य दरड दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पोलादपूर | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (३० मे) दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दापोली येथील माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालवत असलेले वडील गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
तळा । तळा नगरपंचायतीस 13 कोटी 81 लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आला असून शहरातील उर्वरित कामांसाठी आणखी 6 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्यो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
नवी दिल्ली | सीबीएसईने नववी इयत्तेपासून तीन भाषा धोरण लागू करू नये. "नववी इयत्तेत शिकणे आधीच कठीण आहे, मग त्यात तिसर्या भाषेचा समावेश करण्याची काय गरज आहे?” अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली.
भंडारा | प्रशासकीय इमारत झाली पण,टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबीनला सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते कलेक्टरच्या चेंबरला सर्विलेन्सनं जोडा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
कोलकत्ता | टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील सामन्यात टीम इंडियाने दबावाखाली दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. १९६ धावांचं आव्हान समोर असताना क्षणभर सामना विंडीजच्या बाजूने झुकला होता, मात्र संजू सॅमसनच्या तुफानी खेळीने भारताने खेळाचा चेहरामोहराच बदलला.
रत्नागिरी | स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणार्या कोकणातील जागेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत सहा जणांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. यात महायुतीकडून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, महाआघाडीकडून बाळ माने तर शेकापकडून अरविंद म्हात्रे यांचा समावेश आहे.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
नवी मुंबई | ऐरोली परिसरात राहणार्या ४० वर्षीय महिलेने विवाहबाह्य संबंधांमुळे पती अडसर ठरत असल्याच्या कारणावरून प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा तब्बल ११ महिन्यांनंतर उलगडा करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले असून, आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
मुंबई | कोकणातील महायुतीचे दोन नेते माजी मंत्री रामदास कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गटारापासून सुरु झालेला हा वाद मर्कटलीलांपर्यंत पोहचला आहे. त्यातच आता कदम यांचे चिरंजीव आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनीही आता उडी घेतली आहे.
नवी मुंबई | आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवरून आज पनवेलमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. विधिमंडळावर निघालेला महाविकास आघाडी आणि प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा पोलिसांनी पनवेलमध्येच रोखला. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.