उमाजी म. केळुसकर | ज्येष्ठ पत्रकार | ऐतिहासिक किल्ले रायगड आणि परिसरात वारंवार लागणारे वणवे ही केवळ निसर्गाची अवकृपा नसून ती आपल्या प्रशासकीय अनास्थेची आणि ऐतिहासिक वारशाप्रती असलेल्या कृतघ्नतेची जळजळीत साक्ष आहे. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कडाक्याचे ऊन पडत असून, या उष्णतेच्या लाटेत निसर्गाचा कोप होत असतानाच, मानवनिर्मित चुकांमुळे स्वराज्याची राजधानी आगीच्या भक्ष्यस्थानी पडणे ही अत्यंत क्लेशदायक बाब आहे.
पनवेल । पनवेल शहरातील तक्का तसेच करंजाडे परिसरात घरफोडी करणार्या तिघा सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा मोठा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांचा छडा लागल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पनवेल । कळंबोली येथील आशिया खंडातील सर्वात मोठ्या लोह-पोलाद मार्केटमध्ये सध्या गुन्हेगारीचे सावट गडद होत चालले असून, या महत्त्वाच्या व्यापारी केंद्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
कर्जत । कोरोना काळात कर्जत रेल्वे स्थानकावर बंद करण्यात आलेले रेल्वे गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर असोसिएशनकडून सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली असून, कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
माणगाव । माणगाव तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर अवैधरित्या सोलिव खैर लाकूड वाहतूक करणार्या वाहनावर वनविभागाने धाडसी कारवाई करत सुमारे 18 लाख 69 हजार 309 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित वाहनचालकाविरोधात वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे अवैध खैरतोड करणार्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.
उरण । मुंबईजवळील जागतिक वारसा स्थळ घारापुरी (एलिफंटा) लेणी परिसरातील मोरा बंदर येथे सुरू असलेल्या उत्खननात महत्त्वपूर्ण शोध लागला असून, यामुळे या बेटाच्या प्राचीन व्यापारी इतिहासावर नवे प्रकाशझोत पडले आहेत.
पनवेल । कळंबोली सर्कल परिसरात सुरू असलेल्या रस्ते विस्ताराच्या कामामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीत गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात 42 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. फुरकान नासीर पटेल असे मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
अलिबाग | गॅस टंचाईला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने अंत्योदय व प्राधान्य घटकातील कुटुंबांना प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीन वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रायगड जिल्ह्याला १ लाख २० हजार लिटर केरोसीन मंजूर झाले आहे.मात्र केरोसीन वितरण करणारी जुनी यंत्रणा खंडित झाल्याने, मंजूर केरोसीन वितरण करायचे कसे? असा पेच जिल्हा पुरवठा विभागासमोर निर्माण झाला आहे.
पनवेल | नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पनवेल विभागांतर्गत येणार्या पनवेल शहर, पनवेल तालुका आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला एकूण १ कोटी ५७ लाख ६४ हजार ५७० रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला.
अलिबाग । रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी (21 डिसेंबर) जाहीर झाले. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली होती. दोन पक्षांमधील हा राजकीय सामना ‘टाय’ झाल्याचे दिसत आहे.
अलिबाग । मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील रुद्रवली गावाच्या हद्दीत एसटी बसच्या धडकेत एका पादचार्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना 8 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास सीएनजी पेट्रोल पंपाजवळ गोवा बाजूकडे जाणार्या मार्गावर घडली.
मुरुड-जंजिरा | मुरुड तालुक्यातील एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ५२ वर्षीय इसमाने हे कृत्य केले असून, त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरूड | मुरूड-अलिबाग मार्गावरील सर्वे गावाजवळ मोरीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी पडून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते यांनी मागणी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराविरुद्ध मुरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माणगाव | सणासुदी कोकणात परतणार्या चाकरमान्यांना पुन्हा एका वाहतुकीचा सामना करावा लागला. माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहनांच्या रांगा, उन्हात अडकलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची होणारी परवडयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना उसळली आहे.
रोहा । रोहा तालुक्यातील विविध भागांमध्ये बिबट्या आढळल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सातत्याने व्हायरल होत आहेत. कधी एका जंगलात तर कधी दुसर्या ठिकाणी बिबट्या दिसल्याचे संदेश सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहा । रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदी वनश्री समीर शेडगे यांनी 4 हजार 695 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांचे नऊ वर्षांपूर्वी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले.
अलिबाग | बाळाच्या जन्मानंतर काही तासांतच मातेचा मृत्यू झाल्याची दुर्दैर्वी घटना अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. विवा दुर्गवले असे या मातेचे नाव असून ती मूळची श्रीवर्धन येथील राहणारी होती. नवजात बाळ सुखरुप आहे. मात्र एका माऊलीचा करुण अंत झाल्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला समुद्र किनारी भलेमोठे ग्रीन सी टर्टल चिखलात अडकून पडल्याचे आढळून आले. रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर प्रथमच अशाप्रकारचा नर ग्रीन सी कासव आढळला असल्याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांनी दिली.
म्हसळा | राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ११ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुका तर ३ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार, तहसिलदार कार्यालयाद्वारे निवडणुकीची नोटीस ३० मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
म्हसळा । तळा तालुक्यातील मजगाव येथे पोलिसांनी गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरतेने बांधलेल्या एका बैलाची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश जातीचा एक बैल खरेदी करून कत्तलीसाठी आणला होता. या बैलाला अत्यंत क्रूरतेने वागणूक देण्यात आली होती.
पेण | थोर समाजसुधारक डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त पेण तालुक्यातील श्री सदस्यांनी पेण शहरात भव्य स्वच्छता मोहीम राबवत सुमारे १५ टन कचरा गोळा केला. या उपक्रमात तालुक्यातील १५ बैठकांमधील एकूण ९७० श्री सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
पेण | बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. "कोरा झालेला सातबारा मूळ मालकांच्या नावे परत मिळावा” या प्रमुख मागणीसाठी शेतकर्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.
पाली/वाघोशी | रायगड जिल्ह्यातील होळी सण या वर्षी सामाजिक व सेवाभावी पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांमुळे तसेच दानशूर नागरिकांच्या सहकार्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांच्या माध्यमातून शेकडो पुरणपोळ्या आदिवासी वाडी, झोपडपट्टी आणि वृद्धाश्रमातील गरजूंना वाटण्यात आल्या.
सुधागड-पाली । सुधागड तालुक्यातील खेमवाडी येथील भगवान खताळ यांचे वारस झोरे कुटुंबियांनी आपल्या पूर्वजांचे घर खेमजाई नवतरुण मित्रमंडळ, खेमवाडी या सार्वजनिक मंडळाला दान करून अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. या उपक्रमामुळे गावकर्यांना विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे.
कर्जत | रायगड जिल्हा परिषदेचे निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे पाच सदस्य निवडून आले आहेत. या पाच सदस्यांनी आपला गट नेते म्हणून कर्जत तालुक्यातील कडाव गटामधून निवडून आलेले मारुती तथा बाबू घारे यांची निवड केली आहे. या पक्षाकडून आपली गटाची निवड रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात प्रक्रिया पूर्ण करून करण्यात आली.
वावोशी | खोपोली शहरातील बाजारपेठ परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर पोलिसांनी धडक कारवाई करत एकाला रंगेहात पकडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. २ एप्रिल रोजी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी बाजारपेठ परिसरात छापा टाकला.
खोपोली | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. बोरघाट येथील खोपोली एक्झिटजवळ भरधाव वेगातील एका कंटेनरने नियंत्रण गमावून पाच वाहनांना धडक दिल्यानंतर थेट एका कारवर पलटी घातली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
उरण । उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड शहरातील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने येथील रहिवाशांना तब्बल दोन दिवस अंधारात चाचपडत रहावे लागले. महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महाड | ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी वर्ष प्रारंभ झाले असून हे वर्ष महाराष्ट्र शासन समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाड येथे केली.
चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९ व्या वर्धापन दिनासाठी...महाडमध्ये आज भीमसागर उसळणार !
पोलादपूर | कशेडी बोगद्याजवळ एका भरधाव स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने कारमधील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पोलादपूर । आंबेनळी घाटात वळणदार व तीव्र उताराच्या ठिकाणी टाटा नेक्सन कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने कारमधील दहा वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वांचे प्राण वाचविण्यात यश आले.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोलकत्ता | टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील सामन्यात टीम इंडियाने दबावाखाली दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. १९६ धावांचं आव्हान समोर असताना क्षणभर सामना विंडीजच्या बाजूने झुकला होता, मात्र संजू सॅमसनच्या तुफानी खेळीने भारताने खेळाचा चेहरामोहराच बदलला.
नवी दिल्ली । राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या निवडणुका 31 जानेवारी ऐवजी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
नागपूर | राज्यात पापलेट (सिल्वर पॉम्फ्रेट) मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार ५५ मेट्रिक टनांची वाढ झाली असून, हे संवर्धनात्मक उपाययोजनांचे यश असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. शुक्रवारी (१२ डिसेंबर) विधानसभेत निवेदन करताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, शाश्वत मासेमारीसाठी लहान माशांची पकड रोखण्याच्या उद्देशाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी ५४ प्रजातींसाठी किमान कायदेशीर आक्रमण निश्चित केले आहे.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
मुंबई | महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून सर्वसामान्यांच्या जमिनींच्या नोंदीत फेरफार करणार्यांविरोधात राज्य सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे. "दोषी अधिकारी कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याला सोडले जाणार नाही”, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिला.
मुंबई | राज्यातील जलजीवन मिशन अंतर्गत एकूण ५१ हजार ५६० पाणीपुरवठा योजना मंजूर असून त्यापैकी २६ हजार ४९९ योजना पूर्ण झाल्या आहेत उर्वरित २५ हजार ०६१ योजनांची कामे प्रगतीपथावार आहेत. अपूर्ण योजनांसाठी केंद्र शासनाकडून लवकरच निधी प्राप्त होणार आहे अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत दिली.
नवी मुंबई | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव लवकरच देण्यात येणार असून हा निर्णय स्थानिक भूमिपुत्रांचा विजय असल्याचे मत खासदार बाळ्या मामा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यासाठीचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सादर केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.