महाड | महाड शहरातील मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेदरम्यान बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) शिक्षिकेला एका इसमाने धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी महाड शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग | जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यत्वाकडे लक्ष ठेवून असलेल्या इच्छुकांना राज्य सरकारच्या नव्या मसुदा नियमावलीमुळे धक्का बसण्याची चिन्हे आहेत. या मसुद्यात स्वीकृत सदस्य होण्यासाठी आवश्यक निकष अत्यंत नमूद करण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी जशीच्या तशी झाली, तर स्वीकृत सदस्यत्वाकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांचा हिरमोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उमाजी म. केळुसकर | ज्येष्ठ पत्रकार | महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही काळात अनेक योजना आल्या आणि गेल्या, परंतु ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेने जी चर्चा आणि वादंग निर्माणकेले आहे, ते अभूतपूर्व आहे. राज्याच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालाने या योजनेच्या अंमलबजावणीवर आणि सरकारच्या एकूणच आर्थिक धोरणांवर जे गंभीर ताशेरे ओढले आहेत, ते दुर्लक्षित करून चालणार नाही.
बेणसे । सुधागड तालुक्यातील रामनगर परिसरात रविवारी (12 जुलै) एक हृदयद्रावक घटना घडली. रासळ ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी येथे विहिरीत बुडाल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
माणगाव । जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक पाण्यात वाहून जाऊन बेपत्ता झाल्याची घटना रविवारी (12 जुलै) दुपारी घडली. घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि कोलाड येथील बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र उशिरापर्यंत दोघांचा शोध लागला नव्हता.
मुंबई | पनवेल शहरातील वाढत्या पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासन सकारात्मक असून, शिलार धरण प्रकल्पासह विविध पाणीपुरवठा योजनांना गती देण्यात येत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य विक्रांत पाटील यांनी म.वि.प. नियम ९७ अन्वये या विषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थितीत केली होती.
कर्जत | महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात जाऊन महाड नगरपरिषदेचे नगरसेवक सूरज बामणे व इतर साथीदारांनी हल्ला करून मारहाण केली होती.
महाड | महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात घुसून झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी गुरुवारी (९ जुलै) सलग दुसर्या दिवशीही कामबंद आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला.
उमाजी म. केळुसकर | ज्येष्ठ पत्रकार | भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सर्वसामान्य नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी संविधानाने एका भक्कम संरचनेची निर्मिती केली आहे. अन्याय झाल्यास दाद मागण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायपालिका आहे, तर नागरिकांच्या जीविताचे व वित्ताचे रक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासनाची यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे.
रोहा | मुसळधार पावसामुळे आणि भिरा जलविद्युत प्रकल्पातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे रोहा-अष्टमी शहर पुराच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल तीन वेळा पुराचे पाणी शहरात व नदीकाठच्या गावांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
अलिबाग | कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे चांगलेच सक्रिय झाल्याने रायगड जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अलिबाग तालुक्यातील देहेन गावाजवळ असलेल्या बंधार्याला मोठे भगदाड पडून तो वाहून गेला आहे.
अलिबाग | रायगड पोलिसांनी जप्त केलेले तब्बल ३७९.६९१ किलो अमली पदार्थ नष्ट केले. या अमली पदार्थांची एकूण किंमत ३२६ कोटी १० लाख ६ हजार ३२४ रुपये होती. जिल्ह्यातील १२ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल २७ गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल होता. रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कोर्लई | मुरुड-सुपेगाव-रोहा मार्गावरील सुपेगाव परिसरात रस्त्यालगतची झाडे आणि झुकलेल्या फांद्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. रस्त्यावर खाली आलेल्या फांद्या तसेच वाढलेल्या झुडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुरुड | मुरुडमधील काशीद आदिवासीवाडी येथे १८ वर्षीय तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुरुड पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे ते २६ मे दरम्यान ही घटना घडली.
माणगाव | माणगाव तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला असताना माणगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध पथकांच्या मदतीने पोलिसांनी या तरुणापर्यंत पोहोचत तपासाला वेग दिला आहे.
रोहा । रोहा-अष्टमी नगरपालिकेने केलेल्या पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत सोमवारी (22 जून) नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले. सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार टाकण्यात आल्याचा आरोप करत वाढीव दर तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
श्रीवर्धन | राज्यात महावितरणकडून सुरु असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला विरोध दर्शवत श्रीवर्धनमध्ये शेकापने तहसीलदार तसेच महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात निवेदन दिले आले. स्मार्ट मीटर बसविणे ऐच्छिक ठेवावे, ग्राहकांवरील सक्ती थांबवावी आणि वाढीव वीजबिले माफ करावीत, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
बोर्लीपंचतन | श्रीवर्धन तालुक्यातील दिघी खाडीत थरारक घटना समोर आली आहे. या खाडीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांची फायबरची डिंगी मुसळधार पाऊस आणि वादळी वार्यामुळे अचानक पलटी झाली. ‘दिघी क्वीन’ जंगल जेट्टीचे चालक बाळकृष्ण पाटील यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत तिघांचा जीव वाचवला.
म्हसळा | म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शिवसेना शिंदे गटाने अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील शेडगे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादीने जल्लोष केला. मात्र आठ दिवसांपूर्वी फटाके फोडणार्या शिवसेनेच्या गोटात सन्नाटा पसरल्याचे चित्र आहे.
म्हसळा | म्हसळा शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगणार आहे. काही दिवसांपूर्वी चार दिवस नगराध्यक्ष राहिल्यानंतर शाहिद जंजिरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी पुन्हा निवडणूक जाहीर झाली असून १ जून रोजी मतदान आणि निकाल होणार आहे.
पेण | गेल्या महिन्यापर्यंत गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा करणार्या नागरिकांना बुधवारी एक वेगळेच दृश्य पहायला मिळाले. पातळगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीच्या प्रवाहात हजारो एलपीजी गॅस सिलेंडर वाहत येत असल्याचे दिसताच महापुराची भीती विसरुन अनेकांनी ते पकडण्यासाठी नदीत उड्या मारल्या, तर काही जण होड्यांच्या सहाय्याने सिलेंडर गोळा करताना दिसले.
बेणसे | अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे वाकण आणि वजरोली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या तब्बल २८ नागरिकांची रेस्क्यू पथकाने धाडसी बचाव मोहीम राबवत सुखरूप सुटका केली. रेस्क्यू टीमचे सदस्य सागर दहिंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वजरोली गावाजवळ काही बंगल्यांचे बांधकाम सुरू होते.
पनवेल | कामोठे सेक्टर-२१ परिसरात गेल्या आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. चार दिवसांत जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेकापचे पनवेल महानगर जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कुंडलिक वाघमारे यांनी दिला यासंदर्भात महादेव वाघमारे यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नवी मुंबई यांना निवेदन सादर करून सेक्टर-२१ मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
बेणसे | स्मार्ट मीटर बसविल्याच्या कारणावरून महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला अडवून कॉलर पकडत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाली पोलिसांनी पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कर्जत | कर्जत तालुयातील पाली तर्फे कोतवाल-खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पामुळे विस्थापनाची भीती निर्माण झाली असून, मल्टीवाडीतील आदिवासी ग्रामस्थांनी टोरंट पॉवर प्रकल्पासाठी आम्ही आमचे गाव सोडणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
खोपोली | खालापूर तालुक्यातील निगडोली गावात ७५ वर्षीय वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२६ मे) उघडकीस आली. या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे.
खोपोली | खोपोली नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (१३ मे) शहरातील विविध विकासकामांच्या अजेंड्यावर पार पडली. मात्र या सभेत केवळ विकासकामांवर चर्चा न होता, प्रशासकीय कामकाजात काही कार्यकर्ते आणि नगरसेविकांच्या पतींकडून होत असलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला.
उरण | उरण ते मोरा मार्गावरील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर सोमवारी (दि.१) पहाटे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातस्थळी स्पीड बे्रकर बसविण्याची मागणी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
उरण | काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य डॉ.मनीष पाटील यांच्या नियुक्तीनंतर, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
पोलादपूर | सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य दरड दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पोलादपूर | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (३० मे) दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दापोली येथील माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालवत असलेले वडील गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
तळा । तळा नगरपंचायतीस 13 कोटी 81 लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आला असून शहरातील उर्वरित कामांसाठी आणखी 6 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्यो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
भंडारा | प्रशासकीय इमारत झाली पण,टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबीनला सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते कलेक्टरच्या चेंबरला सर्विलेन्सनं जोडा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
कोलकत्ता | टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील सामन्यात टीम इंडियाने दबावाखाली दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. १९६ धावांचं आव्हान समोर असताना क्षणभर सामना विंडीजच्या बाजूने झुकला होता, मात्र संजू सॅमसनच्या तुफानी खेळीने भारताने खेळाचा चेहरामोहराच बदलला.
नवी दिल्ली । राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या निवडणुका 31 जानेवारी ऐवजी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
रत्नागिरी | स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणार्या कोकणातील जागेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत सहा जणांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. यात महायुतीकडून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, महाआघाडीकडून बाळ माने तर शेकापकडून अरविंद म्हात्रे यांचा समावेश आहे.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
नवी मुंबई | आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवरून आज पनवेलमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. विधिमंडळावर निघालेला महाविकास आघाडी आणि प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा पोलिसांनी पनवेलमध्येच रोखला. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
नवीन पनवेल | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. या अनोख्या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
मुंबई | कोकण विभागातील अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकर्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) आणि हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत मदतीचा ४२६ कोटींचा निधी पुढील १५ दिवसांत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.