पेण | मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा परिसरात अवैध पद्धतीने ओव्हरलोडेड गौण खनिज वाहून नेणार्या भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (३० मे) रात्री घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत सुमारे दीड तास महामार्गावर आंदोलन केले.
पोलादपूर | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (३० मे) दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दापोली येथील माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालवत असलेले वडील गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
मुंबई | कोकणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने त्या बदल्यात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर दीड वर्षांनंतर रायगडकरांना मिळणार आहे.
मुंबई | कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर आता शिवसेना आमदारांनी युतीधर्म पाळावा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि नेत्यांना दिल्या. कोकणच्या जागेवरुन एकनाथ शिंदे यांनी कोकणच्या आमदार आणि पदाधिकार्यांची बैठक बोलावली होती.
अलिबाग | कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद जवळपास संपुष्टात आला आहे. महायुतीकडून राष्ट्रवादीचे युवा नेते अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत आज (सोमवारी, १ जून) ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कर्जत | कर्जत तालुक्यातील पेज नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा तेथे बुडून मृत्यू झाला. नदीमधील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२९ मे) सायंकाळी घडली.
पनवेल | कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारसंघनिहाय सदस्यसंख्या समोर आली असून पनवेल तालुका सर्वाधिक १२३ सदस्यांसह आघाडीवर आहे. तरकर्जत तालुका ११३ सदस्यांसह दुसर्या क्रमांकावर आहे.
पनवेल | कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडींमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. या मतदारसंघात संख्याबळ, स्थानिक राजकारण, गटबाजी असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
अलिबाग | महायुतीत विधान परिषद कोकणची जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. अनिकेत तटकरेंना आमदार करण्यासाठी त्यांचे खासदार पिता सुनील तटकरे यांनी ताकद पणाला लावलेली असतानाच,शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली आहे.
नवी मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राज्यातील वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि सर्वसामान्य जनतेवरील आर्थिक संकटाच्या निषेधार्थ ३ जून रोजी नवी मुंबई येथे भव्य राज्यव्यापी ‘रस्ता अडवा’ आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
कर्जत | कर्जत तालुक्यातील इंजवली गावातील एका शेतकर्याच्या तीन म्हशी अचानक मरण पावल्याने तो हवालदिल झाला आहे. या म्हशींच्या मृत्यूचे कारण समजले नाही. या घटनेमुळे त्या शेतकर्याचा दुग्ध व्यवसाय बंद झाला आहे. इंजवली गावातील विष्णू नामदेव फराट यांचा वंश परंपरागत शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय आहे.
मुरुड | मुरुडमधील काशीद आदिवासीवाडी येथे १८ वर्षीय तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुरुड पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे ते २६ मे दरम्यान ही घटना घडली.
मुरुड | मुरुड आगारातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुरुड-बोरीवली रातराणी एसटी बसचे धावत्या अवस्थेत मागील डाव्या बाजूचे चाक निखळल्याची धक्कादायक घटना रविवारी (२४ मे) घडली. सुदैवाने पाठीमागून येणार्या एका सतर्क मोटारसायकलस्वाराने तात्काळ चालकाला याची माहिती दिल्याने मोठा अपघात टळला आणि बसमधील सुमारे ५० प्रवाशांचे प्राण वाचले.
माणगाव | माणगाव तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला असताना माणगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध पथकांच्या मदतीने पोलिसांनी या तरुणापर्यंत पोहोचत तपासाला वेग दिला आहे.
माणगाव | रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेमुळे माणगाव तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहा | रोहे शहरातील उत्पादन शुल्क विभागाने विविध दारुबंदी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली चारचाकी वाहने अज्ञात व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रायकर पार्क येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयालगत उभी केली होती.
धाटाव | रोहा शहराला लागून वाहणार्या बारमाही कुंडलिका नदीत सोमवारी (१८ मे) दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरतीच्या पाण्यात नदीत एक मृतदेह तरंगत असल्याचे पुलावरुन जाणार्या नागरिकांच्या निदर्शनास आले.
अलिबाग | बाळाच्या जन्मानंतर काही तासांतच मातेचा मृत्यू झाल्याची दुर्दैर्वी घटना अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. विवा दुर्गवले असे या मातेचे नाव असून ती मूळची श्रीवर्धन येथील राहणारी होती. नवजात बाळ सुखरुप आहे. मात्र एका माऊलीचा करुण अंत झाल्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला समुद्र किनारी भलेमोठे ग्रीन सी टर्टल चिखलात अडकून पडल्याचे आढळून आले. रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर प्रथमच अशाप्रकारचा नर ग्रीन सी कासव आढळला असल्याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांनी दिली.
म्हसळा | म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शिवसेना शिंदे गटाने अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील शेडगे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादीने जल्लोष केला. मात्र आठ दिवसांपूर्वी फटाके फोडणार्या शिवसेनेच्या गोटात सन्नाटा पसरल्याचे चित्र आहे.
म्हसळा | म्हसळा शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगणार आहे. काही दिवसांपूर्वी चार दिवस नगराध्यक्ष राहिल्यानंतर शाहिद जंजिरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी पुन्हा निवडणूक जाहीर झाली असून १ जून रोजी मतदान आणि निकाल होणार आहे.
पेण | थोर समाजसुधारक डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त पेण तालुक्यातील श्री सदस्यांनी पेण शहरात भव्य स्वच्छता मोहीम राबवत सुमारे १५ टन कचरा गोळा केला. या उपक्रमात तालुक्यातील १५ बैठकांमधील एकूण ९७० श्री सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
बेणसे | पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पेडली गावाच्या हद्दीत सोमवारी (१८ मे) पहाटे भीषण रस्ता अपघात होऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. कार आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या जोरदार धडकेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
पाली/वाघोशी | रायगड जिल्ह्यातील होळी सण या वर्षी सामाजिक व सेवाभावी पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांमुळे तसेच दानशूर नागरिकांच्या सहकार्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांच्या माध्यमातून शेकडो पुरणपोळ्या आदिवासी वाडी, झोपडपट्टी आणि वृद्धाश्रमातील गरजूंना वाटण्यात आल्या.
कर्जत | कर्जत शहरातील महावीर पेठ परिसरात रविवारी (२४ मे) सकाळी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने धुमाकूळ घालत सहा वर्षांच्या चिमुकल्यासह सात ते आठ जणांना चावा घेतल्याची घटना घडली. या प्रकारामुळे मुख्य बाजारपेठेत भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खोपोली | खालापूर तालुक्यातील निगडोली गावात ७५ वर्षीय वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२६ मे) उघडकीस आली. या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे.
खोपोली | खोपोली नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (१३ मे) शहरातील विविध विकासकामांच्या अजेंड्यावर पार पडली. मात्र या सभेत केवळ विकासकामांवर चर्चा न होता, प्रशासकीय कामकाजात काही कार्यकर्ते आणि नगरसेविकांच्या पतींकडून होत असलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला.
उरण | काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य डॉ.मनीष पाटील यांच्या नियुक्तीनंतर, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
उरण | उत्तर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या निवडीमुळे जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विकास गोगावलेंसाठी शिवसेना आक्रमक;तरीही निवडणूक लढवणार,महाडमध्ये शिवसैनिकांचा इशारा
महाड | ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी वर्ष प्रारंभ झाले असून हे वर्ष महाराष्ट्र शासन समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाड येथे केली.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात आठ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी ७ तरुण सातारा जिल्ह्यातील असून एक चिपळूण रत्नागिरीचा आहे. हे सर्वजण दापोली येथे पर्यटनासाठी गेले होते.
तळा । तळा नगरपंचायतीस 13 कोटी 81 लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आला असून शहरातील उर्वरित कामांसाठी आणखी 6 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्यो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
भंडारा | प्रशासकीय इमारत झाली पण,टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबीनला सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते कलेक्टरच्या चेंबरला सर्विलेन्सनं जोडा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
कोलकत्ता | टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील सामन्यात टीम इंडियाने दबावाखाली दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. १९६ धावांचं आव्हान समोर असताना क्षणभर सामना विंडीजच्या बाजूने झुकला होता, मात्र संजू सॅमसनच्या तुफानी खेळीने भारताने खेळाचा चेहरामोहराच बदलला.
नवी दिल्ली । राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या निवडणुका 31 जानेवारी ऐवजी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.