खोपोली | आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतील काळ्या धुराच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त असतानाच कंपनीने दूषित सांडपाणी वेगवेगळ्या शेतांमध्ये सोडल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेती नापीक होण्याच्या भितीने शेतकरी आक्रामक झाले आहे.
कर्जत | कर्जत आणि खालापूर तालुयात शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन होत नाही हे दुर्दैव असून, पाच वर्षात असे मंच उभे राहिले नाही, ही बाब गंभीर असून कृषी संशोधन केंद्रामधील तुमची नियुक्ती कशासाठी आहे? याचा जाब विचारला जाईल, असे कृषी संशोधन केंद्राला ठणकावून सांगत आमदार महेंद्र थोरवे यांनी हमी भावाने भाताची विक्री करणार्या शेतकर्यांना त्याचा मोबदला मिळत नाही ही भूमिका अतिशय चुकीची असल्याचा आरोप थोरवे यांनी केला.
अलिबाग | एमआयएमने घेतलेल्या या निर्णयाबाबत पक्षाचे नेत इम्तियाज जलील यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे. ते मुंबईत बोलत होते. येत्या चार महिन्यांत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. या आदेशानंतर आता निवडणूक आयोगासह राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.
पुणे | भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नुकतंच एसटी प्रशासनाने नव्या ३ हजार बसची खरेदी केली.
मुंबई | ग्रामपंचायत,जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढवायची असल्यास, त्या व्यक्तींनी जातीचे प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
म्हसळा | महामार्गांवर मोकाट गुराुंळे होणार्या अपघातांचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर अशाच एका अपघातात म्हसळा तालुयातील घोणसे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश धोंडू कानसे (वय ४८) गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी (१५ मे) त्यांचे निधन झाले. १२ मे रोजी सरपंच रमेश कानसे हे गावची मिटींग आटोपून बुलेट गाडीने म्हसळा शहरातील निवासस्थानी परतत होते.
अलिबाग | मासेारी बंदी कायद्यानुसार १ जूनपासून खोल सम ुद्रातील मासेारी बंद होणार आहे; मात्र कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांवर त्यापूर्वीच मासेारी नौका बंदरात सुरक्षित नांगरुन ठेवण्याची वेळ आली आहे. किनारपट्टीलगतच्या समुद्रात सायंकाळच्या दरम्यान मुसळधार वारे वाहत आहेत.
महाड / पोलादपूर । महाड आणि पोलादपूर येथे मंगळवारी झालेल्या दोन विविध अपघातांम ध्ये दोघांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत. कापडे बुद्रुक हद्दीत झालेल्या मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या घटनेत महाड विन्हेरे मार्गावर विक्रम रिक्षा आणि आयशर टेम्पोची धडक होऊन एकाचा मृत्यू तर ८ प्रवासी जखमी झाले.
खोपोली | हळदी समारंभात महिला, मुली असल्याने कपडे काढून नका, असे सांगण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण सुरु असताना मध्यस्थी करायला गेलेल्या इसमाला लोखंडी कालथ्याने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा जखमी झाला आहे. याप्रकरणी केळवली रेल्वे स्थानकावरून एकाला अटक करण्यात आली तर एकजण फरार आहे.
नवी दिल्ली। न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपला. त्यांच्यानंतर न्यायमर्ती गवई यांचे नाव ज्येष्ठता यादीत होते. न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यामुळे त्यांचे नाव पुढे केले.
कर्जत | बुद्ध पौर्णिमेला देशभरात प्राणी गणना केली जाते. कर्जत आणि खालापूर तालुयातील काही भाग आदी १३ ठिकाणी चांदण्या रात्री प्राणी गणना करण्यात आली. यावर्षीच्या प्राणी गणनेत आनंदची बाब वन विभाग यांच्यासाठी ठरली आहे. तब्बल दोन ठिकाणी बिबट्याचे अस्तित्व दिसून आले असून मांडवणे रेंजमधील हुमगावचे जंगलात पाणवठ्यावर आलेला बिबट्याचे दर्शन झाले. दरम्यान, गेली काही दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे तालुयात बहुसंख्य ठिकाणी जंगलात पाण्याचे साठे निर्माण झाले आहे.
अलिबाग | विटेवर अल्लाह लिहून विहिरीत टाकल्या... लोकांनी पाहिले आणि त्या म 1. मुस्लिम जोडप्यावर मार खायची वेळ आली.. पोलीस आले, वस्तुस्थिती समजली. मुलीचे प्रेम तुटण्यासाठी आई-वडिलांनी ही काळी जादू केली होती. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील ही घटना आहे. तोपर्यंत विहिरीत विष टाकण्यात आल्याची अफवा गावभर पसरली होती.
21.1k
दिघी | एकीकडे सूर्य आग ओखत आहे.वातावरणात प्रचंड उकाडा सुरू झाला आहे. त्यात आणखी भर म्हणून देखभाल व दुरुस्तीसाठी श्रीवर्धन वाळवटी सेक्षांची मंगळवारी दिवसभर वीज खंडीत करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असून, आता घराबाहेर ही पडवेना आणि घरातही बसवेना अशी अवस्था सर्वसामान्यांची झाली आहे. वातावरणातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने श्रीवर्धन तालुका चांगलाच तापला आहे.
दिघी | बोर्लीपंचतन एसटी निवारा शेडचे विस्तारीकरण व्हावे यासाठी सातत्याने मागणी होत असताना बाजारपेठेतील गर्दी तसेच वाढत्या पर्यटकांसोबत महिला एसटी प्रवाशांची याठिकाणी शौचालयाची मागणी होत आहे. स्वच्छतागृहांअभावी परिसरातील नागरिकांची कुचंबणा होत आहे. गेली कित्येक वर्ष बोर्ली शहराला शौचालयाच्या समस्येने ग्रासले आहे.
माणगाव | भरधाव वेगाने येणार्या मारुती इको गाडीची अँटिव्हा दुचाकी गाडीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू होऊन चालकासह दोन जण जखमी होऊन दुचाकीचे नुकसान झाले. सदरील अपघात हा मंगळवारी, ६ मे रोजी रात्री ८.३० वाजता माणगाव तालुयातील गारळ गावच्या हद्दीत हॉटेल कोकण सम्राटजवळ मुंबई-गोवा महामार्गावर मुगवली फाट्याजवळ घडला.
माणगाव | तालुयात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असतानाच माणगाव नगरपंचायत हद्दीत विविध कंपनीतील कामगार वर्ग व तंत्रज्ञ हि मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे कामगार तालुयाच्या ठिकाणी रहात असल्याने शहरीकरणावर अधिक ताण पडत आहे. याबरोबरच छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापारी हि मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पर्यायाने माणगावचे शहरीकरण, नागरिकरण झपाटयाने वाढत असताना या शहरात दैनंदिन निर्माण होणार्या घनकचर्याचा प्रश्नही तितकाच बिकट बनत चालला आहे.
धाटाव | रोहा तालुयातील तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. हा खटला माणगाव कोर्टात चालला, ८ मे रोजी निकाल जाहीर झाला, मात्र सर्व आरोपी निर्दोष सुटले. कोर्टाने दिलेला निर्णय दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त करत रोह्यातील शेकडो महिलांसह नागरिकांनी मंगळवारी (१३ मे) पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी राम मारुती चौक ते तहसीलदार कार्यालय असा जनआक्रोश मोर्चा काढत संतापाला वाट करुन दिली.
खारी/रोहा | महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना संलग्न रोहा तालुका शाखेच्या माध्यमातून कृषी सहाय्यक संघटनेच्या कार्यकारी पदाधिकारी वर्गाने उपविभागीय कृषी अधिकारी शुभम बोराडे आणि रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांना आपल्या प्रलंबित विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठीचे निवेदनाद्वारे ५ मेपासून ते १५ मेपर्यंत विविध स्तरावर आंदोलन पुकारल्याचे नमूद केले आहे.
बोर्लीपंचतन | श्रीवर्धन तालुयातील बोर्लीपंचतन गावाला पाणी पुरवठा करणार्या कार्ले नदी लगत असणार्या विहिरींच्या परिसरातील नदी पात्रामध्ये अवैधरित्या खोल खड्डे खणून रेजग्याचा उपसा होत असल्याने नदीपात्रातील पाणी गढूळ होण्याबरोबरच नदीपात्रालगत गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या विहिरींमधील पाण्याची पातळीसुध्दा कमी होत असून पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे.
श्रीवर्धन | श्रीवर्धन तालुक्यात कारिवणे वरचीवाडी येथील शेतकर्यांच्या गोठ्यातील बकर्यांवर बिबट्याने हल्ला केला. यातील एका बकरीला त्याने खिडकी बाहेर खेचत फडशा पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने कारिवणे परिसरात घबराट पसरली आहे. कारिवणे (वरची वाडी) येथील केशव राजाराम जोशी यांनी गोठ्यात त्यांची गुरे व बकर्या बांधून ठेवल्या होत्या.
म्हसळा | तालुयातील अती दुर्गम भागातील कोळवट येथील ग्रामस्थांवर गाव मंदिरात मधमाशांनी हल्ला करण्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजताचे दरम्यान घडली आहे. मधमाशांच्या हल्यात गावातील ४२ ग्रामस्थ जखमी झाले. जखमीमध्ये एक गतीमंद तर एक वयोवृद्ध आणि १३ बालकांचा समावेश आहे. कोळवट ग्रामस्थ दर सोमवारी मंदिरात सकाळी महाआरतीसाठी जातात.
पेण | पेण परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. सुखसागर सोसायटी, चिंचपाडा, पेण येथे राहणारे पोलिस कर्मचारी रुपेश पांडुरंग भोनकर (वय ५०) यांचा मत्स्यगंधा एक्सप्रेस (रेल्वे क्र. १२६१९) च्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर रेल्वे गाडी मुंबईहून मेंगलोरकडे जात असताना, पेण हद्दीतील अंतोरे रेल्वे ब्रिज जवळ भोनकर यांना जोरदार धडक बसली.
पेण| महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनामुळे पेण बस स्थानकात ऐन लग्नसराईमध्ये प्रवाशांचे फार हाल झाले. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे वार्षिक अधिवेशन सोमवारी (५ मे) संध्याकाळी माणगाव येथे आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी संघटनेच्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात रजा घेतल्या. त्याचा परिणाम एसटीच्या दैनंदिन फेर्यांवर झाला. पेण बस स्थानक जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे.
पनवेल | रायगड जिल्ह्यामध्ये एकेकाळी तुल्यबळ आणि प्रमुख समजल्या जाणार्या शेतकरी कामगार पक्षाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे. अलिबाग येथील दणयानंतर पनवेल उरण मध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणात ओहोटी लागली आहे, आणि भारतीय जनता पक्षात महाभरती सुरू झाली आहे.
पनवेल | शेकापचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे आणि त्यांचे पुत्र प्रितम म्हात्रे यांच्यासह शेकापचे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. म्हात्रे यांनी पक्षाला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे शेकापला पनवेलमध्ये मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, कॅबिनेट मंत्री आशिष शेलार तसेच रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षात जोरदार स्वागत केले. उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
सुधागड | प्रेयसी टाळत असल्याने संतापलेल्या प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीची कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या केली. नंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रेयसीच्या बाजूला त्याने गळफास घेऊन स्वतःचेही जीवन संपवले. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता ही घटना समोर आली. परळी येथील डॉ. कल्पेश ओसवाल यांच्या राजेश पॉलीलिनिक अँड नर्सिंग हो दवाखाना येथे ही घटना घडली आहे.
पाली | अवकाळी पावसाने मंगळवारी (१३ मे) दुपारी पाली, परळी, पेडली, महागाव, नांदगावसह सुधागड तालुयाला झोडपून काढले. दुपारी सुधागडात वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे तालुयात जनजीवन विस्कळीत झाले. पाली खोपोली राज्य मार्गावर परळीसह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, फांद्या तुटून पडल्या.
उरण | बंदी असतानाही करंजा बंदर परिसरात एलईडी पद्धतीने मासेमारी करणार्या दोन बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकार्यांनी ९ मे रोजी छापा टाकून कारवाई केली. यावेळी दोन बोटीवरील थ्री फेज जनरेटर ४ हजार, ३ हजार वॅट एलईडी बल्ब जप्त करण्यात आले आहे.
उरण | पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचाच भाग म्हणून अतिमहत्त्वाच्या ठिकाणी बुधवारी (७ मे) मॉक ड्रिल करण्यात आले. यात उरणमधील सात ठिकाणी ‘ऑपरेशन अभ्यास’ करण्यात आला.
महाड । महाड शहर आणि तालुक्यातील मटका, जुगारासह इतर अवैध धंदे बंद व्हावेत, या मागणीसाठी शिवभक्त सुभाष मोरे यांनी मंगळवारी (१३ मे ) महाड शहर पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवित त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.
पोलादपूर | पोलादपूर शहरातील आनंदनगर येथे राहणार्या वैभव पालकर यांचा ४ मे रोजी कामावरून घरी येत असताना सकाळी पावणेआठच्या सुमारास लोहारे गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. अज्ञात आयशर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मात्र या अपघातानंतर आयशर चालक हा पसार झाला होता. त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातून एक वीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. अक्षरा शुभम पवार असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून ती सध्या गोकुळधाम सोसायटीच्या मागे राहत होती.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तळे | रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन खा.सुनील तटकरे आणि शिवसेना आमदारांमधील दुरी कमी होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिने तोंड न पाहणारे हे नेते आता हळूहळू एका व्यासपीठावर येऊ लागले आहे. आ. थोरवे, आ. दळवी यांच्यानंतर मंत्री भरत गोगावले हेदेखील तटकरेंसोबत एकत्र पहायला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांमध्ये दिलजमाई झाली का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
इंदूर | इंदूर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एकेकाळी शहरात भिकार्यांची संख्या पाच हजार होती. इंदूरसह देशातील १० शहरे भिकारीमुक्त करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. एखादं शहर भिकारीमुक्त होऊ शकतं, असं म्हटलं तर कदाचित तुचा विेशास बसणार नाही.
रत्नागिरी | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणार्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल तर, कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा. रत्नागिरीसह कोकणातील रेल्वे स्थानक जगातील चांगली रेल्वे स्थानके करु, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरी | महायुती सरकारमध्ये खातेवाटप करण्यात आले. यानंतर आता महायुती सरकारमध्ये पालक मंत्रीपदावरू न रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत असतानाच, रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळावे अशी इच्छा योगश कदम यांनी व्यक्त केली आहे.
कोकणातील सवारचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे.
मुंबई | राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची आज बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणाविषयी मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पर्यावरण नुकसान टळणार आहे. तर वाळूच्या माध्यमातून ग्रामीण भागात पसरलेल्या गुंडगिरी आणि वाळू माफियाना मोठा दणका बसला आहे.
मुंबई | नागरी लष्करी समन्वयाबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तीनही दलाचे अधिकारी उपस्थित होते. नागरी लष्करी समन्वयाबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तीनही दलाचे अधिकारी उपस्थित होते.