दिघी | बोर्लीपंचतन एसटी निवारा शेडचे विस्तारीकरण व्हावे यासाठी सातत्याने मागणी होत असताना बाजारपेठेतील गर्दी तसेच वाढत्या पर्यटकांसोबत महिला एसटी प्रवाशांची याठिकाणी शौचालयाची मागणी होत आहे. स्वच्छतागृहांअभावी परिसरातील नागरिकांची कुचंबणा होत आहे. गेली कित्येक वर्ष बोर्ली शहराला शौचालयाच्या समस्येने ग्रासले आहे.
सुधागड-पाली | वाकण पाली राज्य महामार्गावर पालीतील अंबा नदी पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर इंजेशन, सलाईन, नळ्या, इंजेशनच्या रिकाम्या बाटल्या, इंजेशन सुई व इतर वैद्यकीय कचरा २८ एप्रिल रोजी सायंकाळी पडलेला आढळून आला आहे.
कर्जत | कर्जत तालुक्यात वाढत्या वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिकांचा संयमाचा बांध तुटू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्यावतीने महावितरण कार्यालयात अचानक धडक देण्यात आली. या धडक कारवाईने महावितरण प्रशासनाची धांदल उडाली असून समितीने तातडीने योग्य उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पनवेल | शेकापचे नेते जे. एम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पक्षाला इतकेदिवस अल्टीमेटम देऊनही निर्णय न घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र आपण यापुढे मविआ बरोबर काम करू शकत नाही असे त्यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे शेकाप नेतृत्वासमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे.
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील उसर परीसरात गेल इंडिया कंपनीच्या नवीन प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू आहे. या उभारणीच्या कामात स्थानिकांना आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित अधिकारयांना दिल्या. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र सेल स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
अलिबाग | रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या दरम्यान असलेल्या सावित्री खाडीत बिनबोभाटपण वाळूउपसा केला जात आहे. रेती गटांच लिलाव झालेले नाहीत, नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नसताना रात्रीच्या वेळी सक्शन पंप लावून अनधिकृतपणे वाळूची चोरी केली जात आहे. मात्र यावर प्रशासन कुठलीच कारवाई करताना दिसत नाही. यावर खा. सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाड | १ मे महाराष्ट्र दिनी रायगडच्या मुख्यालयात होणार्या झेंडावंदनाचा मान पुन्हा एकदा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोघांकडेही मंत्रीपद असताना दोघांना समान संधी देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती.
पनवेल | आपल्या परिसराचा विकास व्हावा यासाठी विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यशस्वी कामगिरी केली आहे. तसेच पनवेल मतदार संघात देखील पक्षाला चांगले यश मिळाले असून येणार्या काळात आपले आणखी आमदार वाढणार आहेत.
महाड | पहेलगाम येथे अतिरेयांनी पर्यटकांचे केलेले हत्याकांड अमानवी आणि नृशंस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकासमंत्री ना. भरत गोगावले यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार या पाकिस्तान पुरस्कृत हत्याकांडाला करारा जबाब देत बदला घेईल असा ठाम विेशासही त्यांनी व्यक्त केला.
कर्जत | विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा निसटता पराभव झाला असला तरी सुधाकर घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदार वाटत आहेत. त्याचवेळी तुम्ही सत्तेत आहात कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचा राज्यातील महायुती सरकारमध्ये ३३ टक्के वाटा आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपण सत्तेत आहोत हे ध्यानात ठेवून विकास कामे करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यातून आपला पक्ष दोन्ही तालुयात क्रमांक एकचा पक्ष आहे, असे विधान परिषदेचे माजी सदस्य अनिकेत तटकरे यांनी म्हटले.
मुंबई | एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजना करता, एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. तसेच मेडिक्लेम आणि हॉटेल थांब्यासाठी नवे धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
कर्जत | कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील भात संशोधन केंद्रात भात पौदास आणि वाण यांची अधिक प्रमाणात निर्मिती व्हावी यासाठी ‘मुख्यमंत्री कृषी संशोधन केंद्र सुरू होत आहे.
21.1k
मुरुड जंजिरा | पुण्याहून मुरुडमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांच्या लहान मुलीचा हॉटेलमधील स्विमींग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. माही चक्रधर ताकभाते (वय ५ वर्षे) असे या चिमुरडीचे नाव आहे. सध्या मुरुड येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे मुरुड समुद्र किनारा व आजुबाजूचा परिसर गजबजून गेला आहे.
माणगाव | तालुयात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असतानाच माणगाव नगरपंचायत हद्दीत विविध कंपनीतील कामगार वर्ग व तंत्रज्ञ हि मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे कामगार तालुयाच्या ठिकाणी रहात असल्याने शहरीकरणावर अधिक ताण पडत आहे. याबरोबरच छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापारी हि मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पर्यायाने माणगावचे शहरीकरण, नागरिकरण झपाटयाने वाढत असताना या शहरात दैनंदिन निर्माण होणार्या घनकचर्याचा प्रश्नही तितकाच बिकट बनत चालला आहे.
माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले माणगाव हे तालुयाचे महत्त्वाचे ठिकाण असून, येथे दररोज शेकडो प्रवासी एस.टी. बसचा वापर करतात. मात्र माणगाव एस.टी. आगारात आजही जुन्या, गंजलेल्या आणि वारंवार बिघडणार्या बसगाड्याच धावत आहेत. बसमधील वारंवार होणार्या बिघाडीच्या घटना घडत असल्याने याचा प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे.
रोहा | समीर शेडगे यांनी अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रिक्त झालेल्या रोहा तालुका प्रमुखपदासाठी ५ जण इच्छुक असल्याने चुरस निर्माण झाली आहे. या अनुषंगाने बोलाविण्यात आलेल्या बैठकीत शिवसैनिकांची तुफान गर्दी जमली होती. यावेळी पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भावना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली.
रोहा | रोह्यामध्ये धाटाव एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीच्या गोदामाला मंगळवारी (१५ एप्रिल) दुपारी आग लागली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. उष्णतेमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीचे गोदाम आहे.
श्रीवर्धन | श्रीवर्धन तालुक्यात कारिवणे वरचीवाडी येथील शेतकर्यांच्या गोठ्यातील बकर्यांवर बिबट्याने हल्ला केला. यातील एका बकरीला त्याने खिडकी बाहेर खेचत फडशा पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने कारिवणे परिसरात घबराट पसरली आहे. कारिवणे (वरची वाडी) येथील केशव राजाराम जोशी यांनी गोठ्यात त्यांची गुरे व बकर्या बांधून ठेवल्या होत्या.
श्रीवर्धन | श्रीवर्धन येथील जीवना बंदर या ठिकाणी जेट्टीचे मोठ्या प्रमाणावरती काम सुरू आहे. त्याचप्रमाणे श्रीवर्धन दांडा या ठिकाणीदेखील जेट्टीचे काम सुरू आहे. या जेट्टीच्या कामासाठी दहा टायरच्या डंपरमधून खूप मोठ्या प्रमाणात दगडांची वाहतूक करण्यात येत आहे. मात्र डंपर चालकांच्या बेपर्वाईमुळे अनेक वेळा महावितरणच्या विजेच्या खांबांना धडक मारण्यात येऊन, श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा तासंतास खंडित होत आहे.
म्हसळा | शहरांत अरुंद रस्त्यांमुळे स्वयंशिस्तीचे धोरण आणि पोलीस प्रशासनाला मदत म्हणून एस.टी. मंडळाच्या बसेस वन वे मार्गा ने जात असतात, परंतु अन्य खाजगी वाहने दोनही बाजूने वाहतुकीचे नियम तोडून जातात. अशातच तांबट आळीतील अरुंद रस्त्यावर श्रीवर्धन कोलमांडला मुंबई बस मुंबईच्या दिशेने जात असताना श्रीवर्धनकडे जाणार्या वॅगनारचा चालक अब्दुल हाजी नजीर अहमद खतीब (वय ४०, रा. आगरदांडा) याची कार एसटीला घासली.
म्हसळा | म्हसळा तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तालुक्यातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात याव, अशी मागणी तहसीलदार सचिन खाडे व पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्याकडे करण्यात आली. अवजड वाहतूक सुरू असल्याने भयंकर अपघात वाढत चालले आहेत. स्थानिक नागरिकांच्या व पर्यटकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेण | दिवा-सावंतवाडी ही बंद केलेली रेल्वे गाडी पुन्हा पेण रेल्वे स्थानकात थांबविण्यात यावी, अशी मागणी पेणकरांच्यावतीने करण्यात आली आहे. कोरोना काळापासून दिवासाव ंतवाडी, दादर-रत्नागिरी या रेल्वे गाड्या पेण रेल्वे स्थानकात थांबत नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. दर महिन्याच्या दुसर्या व चौथ्या रविवारी पेण प्रवासी संघ आढावा बैठक घेत आहेत.
पेण | मुंबई-गोवा महामार्गावर पेणजवळील तरणखोप गावालगत एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या जोडप्याला गावठी कट्टा दाखवून लुटल्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी पेण पोलिसांनी तपास करत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
सुधागड-पाली | म्हसळा तालुक्यातील रेवली येथील गरीब शेतकरी प्रतिभा प्रकाश पदरत यांनी त्यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासरावर बिबट्याने नुकताच हल्ला करुन वासरावर हल्ला केला. या प्रकाराने तालुक्यातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रतिभा पदरात यांनी आपल्या गोठ्यात गुरे बांधून ठेवली होती.
खोपोली | कर्जत - खोपोली मध्य रेल्वे मार्गावरील केळवली व डोलवली रेल्वेस्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी बेवारस मृतदेह सापडला आहे. मृतदेह दगडाखाली लपविल्याचे प्रथमदर्शनी माहिती मिळाल्यामुळे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर मृतदेह चार-पाच दिवसांपूर्वीचा असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.
खोपोली | जुना मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात बॅटरी हिल अमृतांजन ब्रीजजवळ भरधाव मालवाहु ट्रकने पाच वाहनांना धडक दिल्याने, झालेल्या भीषण अपघातात इनोव्हामधील पिता-लेकीसह तिघांचा मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झाले. दरम्यान, या अपघातप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे. अपघातग्रस्त इनोव्हा कारमधील प्रवासी हे अलिबागवरुन पुण्याच्या दिशेने निघाले असताना ही दुर्घटना घडली.
उरण | उरण तालुक्यातील जेएनपीए पोर्ट ते पनवेल मार्गावरील फ्री गेट सिग्नलजवळ रस्ता ओलांडताना भरधाव ट्रेलर चालकाने एका आठ वर्षीय मुलीला चिरडल्याची घटना घडली आहे.
उरण | जेएनपीएमुळे विस्थापित झालेल्या हनुमान कोळीवाडा गावाचे योग्य पुनर्वसन झाले नसल्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ १४ एप्रिल रोजी उरण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर हनुमान कोळीवाडा गावातील काही ग्रामस्थांनी या आंदोलनाशी गावाचा काहीही संबंध नसल्याचे प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातून एक वीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. अक्षरा शुभम पवार असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून ती सध्या गोकुळधाम सोसायटीच्या मागे राहत होती.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील कापडे विभागातील बाजिरे येथील एका शेतकर्याच्या गुरांच्या वाड्याला वणव्यामुळे अचानक आग लागली. या आगीत वाडा पूर्णतः भस्मसात झाला असून, वाड्यात असलेल्या काही छोटी वासरे व एक गाय होरपळून गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना. सोमवारी, १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
तळे | रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन खा.सुनील तटकरे आणि शिवसेना आमदारांमधील दुरी कमी होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिने तोंड न पाहणारे हे नेते आता हळूहळू एका व्यासपीठावर येऊ लागले आहे. आ. थोरवे, आ. दळवी यांच्यानंतर मंत्री भरत गोगावले हेदेखील तटकरेंसोबत एकत्र पहायला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांमध्ये दिलजमाई झाली का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
तळा/अलिबाग | भैय्या एक पिशवी दो...ताई एक पिशवी द्या...घरातून हात हलवत बाजारात गेल्यानंतर, पिशवीसाठी दुकानदाराकडे हात पसरण्याची घाणेरडी सवय, मुक्या जनावरांसाठी किती घातक ठरते? याचे उदाहरण रायगड जिल्ह्यातील तळा शहरात पहायला मिळाले. पुसाटी येथील एका गायीच्या पोटातून तब्बल १८ किलो प्लास्टिक काढण्यात आले.
उरण | उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांची बदली होऊन तीन ते चार महिने झाले तरीही उरण पंचायत समितीला अद्याप कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे विकास कामांवर परिणाम होत असून, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे.
नागपूर | केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरु आहेत. शेतकर्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकर्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुणे | पुण्यातून सुरु झालेल्या गिया बार्रेचे रुग्ण आता राज्यभरात आढळत आहेत. दुषित पाण्यामुळे या आजाराचा धोका असल्याचे सांगितले जात होते. मात्र चिकनमुळेही ‘जीबीएस’चा आजार होऊ शकतो, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे चिकन पूर्ण शिजवून सोबतच चिकन घेताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
रत्नागिरी | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणार्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल तर, कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा. रत्नागिरीसह कोकणातील रेल्वे स्थानक जगातील चांगली रेल्वे स्थानके करु, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरी | महायुती सरकारमध्ये खातेवाटप करण्यात आले. यानंतर आता महायुती सरकारमध्ये पालक मंत्रीपदावरू न रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत असतानाच, रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळावे अशी इच्छा योगश कदम यांनी व्यक्त केली आहे.
कोकणातील सवारचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे.
मुंबई | देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची स्थापना होऊन आता मंत्रिमंडळ बर्यापैकी स्थिरावले आहे. पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. यावर मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा इच्छा बोलून दाखवली असून, वाघेश्वराकडे आपण साकडे घातल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नवीन पनवेल | किराणा दुकानाचे फोटो आणि शूटिंग करताना याबाबत विचारणा केली असता तुमच्या विरोधात छेडछाडीची तक्रार करते असे बोलून ५० हजारांची मागणी केल्याप्रकरणी तिघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.