म्हसळा । म्हसळ्यातील रखडलेल्या पाणी योजनांवरुन खा.सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त करत, ‘काम सुरु करा अन्यथा ठेकेदारी कायमची रद्द करु’, असा इशारा ठेकेदाराला दिला आहे. खा.तटकरे सोमवारी (29 डिसेंबर) म्हसळ्याच्या दौर्यावर आले होते.
खोपोली । खोपोली येथे नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश सदाशिव काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटातर्फे सोमवारी (29 डिसेंबर) सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला. राजकीय वैमनस्यातून शुक्रवारी (26 डिसेंबर) सकाळी सुमारे 7 वाजता मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती.
महाड । महाड एमआयडीसीतील सुदर्शन केमिकल कंपनीत सोमवारी (29 डिसेंबर) सायंकाळी वायुगळतीची घटना घडल्याने परिसरात काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कंपनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ टळला.
पनवेल । पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने, त्याआधीच सोमवारी महायुतीची घोषणा करण्यात आली.
पनवेल । महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोडपालीत शेतकरी कामगार पक्षाला धक्का बसला आहे. शेकापचे अनेक प्रमुख कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आ.प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रमुख आ.महेश बालदी, परेश ठाकूर यांच्या हस्ते प्रवेशकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
दिघी । माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन या महत्त्वाच्या मार्गावरील स्थानिक एसटी बस वेळेवर न लागल्याने शुक्रवारी माणगाव एसटी स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली. सकाळी 10.30 वाजल्यापासून तब्बल तीन तास एकही बस न सोडल्याने शेकडो प्रवासी स्थानकात अडकून पडले.
माणगाव । माणगाव शहरातील मोरबा रोड परिसरातील नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि जीवनमान धोक्यात आणणारी गंभीर समस्या गेली पाच वर्षे प्रलंबित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मोर्बा रोडवरील रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधली असली, तरी नगरपंचायत आणि महामार्ग प्राधिकरण यांच्यातील जबाबदारीच्या वादामुळे या गटारांची गेल्या पाच वर्षांत एकदाही नीट साफसफाई झालेली नाही.
अलिबाग । खोपोलीतील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या घटनेचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटायला सुरूवात झाली आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारी (28 डिसेंबर) शिवसैनिकांनी अलिबाग तालुक्यातील पोयनाड नाका येथे निदर्शने केली.
नवीन पनवेल । पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी सतर्कता बाळगत धडाकेबाज कारवाई केली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून पोलिसांनी एकाकडून एक पिस्टल आणि सहा जीवंत काडतुसे जप्त केली आहेत.
अलिबाग । रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी (21 डिसेंबर) जाहीर झाले. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली होती. दोन पक्षांमधील हा राजकीय सामना ‘टाय’ झाल्याचे दिसत आहे.
अलिबाग | अलिबाग तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. नागाव येथे सहा जणांना जखमी केल्यानंतर फसार झालेल्या बिबट्याने शुक्रवारी (१२ डिसेंबर) सकाळी आक्षी येथील साखर परिसरात दोन जणांवर हल्ला चढवला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागपूर | राज्यात पापलेट (सिल्वर पॉम्फ्रेट) मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार ५५ मेट्रिक टनांची वाढ झाली असून, हे संवर्धनात्मक उपाययोजनांचे यश असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. शुक्रवारी (१२ डिसेंबर) विधानसभेत निवेदन करताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, शाश्वत मासेमारीसाठी लहान माशांची पकड रोखण्याच्या उद्देशाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी ५४ प्रजातींसाठी किमान कायदेशीर आक्रमण निश्चित केले आहे.
अलिबाग । राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक व भावी उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काही उमेदवारांनी थेट मतदारसंघातील "लाडक्या बहिणी" आणि नागरिकांसाठी देवदर्शन तसेच पर्यटन सहलींचा मार्ग अवलंबल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुरुड-जंजिरा । नाताळ नाताळ व वर्षाअखेरीच्या सुट्यांच्या पोर्शभूमीवर मुरुड तालुक्यातील काशीद, मुरुड, नांदगाव तसेच ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. मुरुडसह श्रीवर्धन, अलिबाग, नागाव, रेवदंडा, आक्षी, किहीम आदी पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलून गेली असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुरुड । नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुराधा मंगेश दांडेकर यांनी 245 मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. अनुराधा दांडेकर यांना एकूण 4 हजार 194 मते मिळाली असून, शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिस्पर्धी कल्पना संदीप पाटील यांना 3 हजार 949 मते मिळाली.
माणगाव । माणगाव ख्रिसमस, शनिवार रविवारच्या सलग सुट्ट्या आणि थर्टी फर्स्टच्या पोर्शभूमीवर पुणे, मुंबई, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाकडे जाणार्या पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. मात्र या पर्यटकांचे स्वागत करण्यास माणगावची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
रोहा । रोहा तालुक्यातील विविध भागांमध्ये बिबट्या आढळल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सातत्याने व्हायरल होत आहेत. कधी एका जंगलात तर कधी दुसर्या ठिकाणी बिबट्या दिसल्याचे संदेश सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहा । रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदी वनश्री समीर शेडगे यांनी 4 हजार 695 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांचे नऊ वर्षांपूर्वी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले.
श्रीवर्धन । राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि मंत्री अदिती तटकरे यांचा होमग्राऊंड समजल्या जाणार्या श्रीवर्धन नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदी शिवसेना ठाकरे गटाचे अॅड.अतुल चौगुले विजयी झाले आहेत. त्यांनी अक्षरशः ‘एकटा टायगर’सारखी निवडणूक लढवली. त्यांनी माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांचा 219 मतांनी पराभव केला.
म्हसळा | म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड येथील वृध्द दाम्पत्याची त्यांच्या दोन मुलांनीच गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. म्हसळा पोलिसांनी या खूनाचा उलगडा पोलिसांना केला असून दोघांना अटक केली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पेण। पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रितम पाटील या निवडून आल्या आहे. या विजयाबरोबरच प्रितम पाटील यांनी नगराध्यक्षपदाची हॅट्रीक मारली आहे.
पेण | पेणखोपोली मार्गावरील अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नसून रविवारी (२ डिसेंबर) रात्री पुन्हा एकदा भीषण अपघाताने परिसर हादरला. रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास आंबेघर पेट्रोल पंपाजवळील हॉटेल टिक्का समोर वेगाने धावणार्या अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
सुधागड-पाली । सुधागड तालुक्यातील खेमवाडी येथील भगवान खताळ यांचे वारस झोरे कुटुंबियांनी आपल्या पूर्वजांचे घर खेमजाई नवतरुण मित्रमंडळ, खेमवाडी या सार्वजनिक मंडळाला दान करून अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. या उपक्रमामुळे गावकर्यांना विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे.
वाघोशी । सुधागड तालुक्यातील पाली पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत मेढ्यांच्या झुंजीच्या नावाखाली चालणारा अवैध सट्टा उधळून लावला. या प्रकरणात पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 75 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेजण फरार झाले आहेत.
माथेरान । माथेरानमधील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन कोतवाल रोड येथील हेल्थ केअर सेंटरमध्ये हार्मनी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी माफक दरात तपासणी व औषधोपचार सुविधा सुरू करण्यात आली आहे.
कर्जत । कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला असून,निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आणि इतर मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या R
खोपोली । खोपोली शहरासह महाराष्ट्राला हादरवून टाकणार्या मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी 24 तासांत सूत्रधारासह 9 जणांना अटक केली आहे. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
उरण । उरण तालुक्यात चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील 100 एकर जागेवर भराव टाकून एमआयडीसी आणि मेरिटाईम बोर्डाकडून मल्टीमॉडेल लॉजिस्टीक पार्कची उभारणी करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आधीच उधाणामुळे हजारो एकर शेती नापीकी झालेले असतना आता हा प्रकल्प येत असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातारण झाले आहे.
उरण । उरण नगरपालिकेवर याआधी भाजपची म्हणजेच आमदार महेश बालदी यांची सत्ता होती. मात्र या निवडणुकीत उरणकरांनी बालदी यांना जोरदार झटका दिला आहे. भाजपकडून दिलेल्या उमेदवार शोभा कोळी-शाह यांचा महाआघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी पराभव केला आहे.
महाड । रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित, शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महाड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिंदे शिवसेनेचे सुनील कविस्कर हे विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपद जरी शिवसेनेकडे गेले असले तरी राष्ट्रवादी-भाजप युतीने नगरसेवकपदाच्या 12 जागा जिंकून आणल्या आहेत.
पोलादपूर । आंबेनळी घाटात वळणदार व तीव्र उताराच्या ठिकाणी टाटा नेक्सन कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने कारमधील दहा वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वांचे प्राण वाचविण्यात यश आले.
पोलादपूर । पोलादपूर तालुक्यातील सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक ज्ञानू हजारे (वय 66, रा. अंकलखोप, ता. पलुस, जि. सांगली) यांच्याविरोधात आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा 2003-06 या कालावधीत झालेल्या ठेव व्यवहारांसंदर्भात 2018- 2023 च्या लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागपूर | राज्याच्या वाळू निर्गती धोरणानुसार वाळू गटातील १० टक्के वाळू घरकुलांसाठी राखीव ठेवण्यात येत आहे. तथापि, कृत्रिम वाळूचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर असल्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य कृपाल तुमाने यांनी कमी दरात वाळू उपलब्ध होत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
नागपूर | राज्यातील महिला स्वयंसाहाय्यता गटांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘उमेद मॉल’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याचे लक्ष्य असून, त्यासाठी सरकारने २०० कोटींची तरतूद केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
अलिबाग । नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि ठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीत अडकून पडले. नाताळचा सण आणि सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडले. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.
नवी मुंबई । नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून गुरुवारी, 25 डिसेंबर रोजी व्यावसायिक प्रवासी वाहतुकीला अधिकृत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चार हजारांहून अधिक प्रवाशांनी या विमानतळातून प्रवास करत नवी मुंबईचा हवाई प्रवास अनुभवला. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्वतः पहिल्या उड्डाणातील प्रवाशांचे स्वागत केले.
नवी मुंबई | नवी मुंबई प्रकल्पासाठी सिडको मंडळाने अधिसूचित केलेल्या रायगड जिल्ह्यातील सुमारे ६० हेक्टर ९५ गुंठे जमिनीच्या मालकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने सखोल चौकशीचा निर्णय घेतला आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.