गेल्या ४५ वर्षांपैकी फक्त आठ वेळाच महामंडळाला नफा , महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

24 Jun 2025 13:36:18
 mumbai
 
मुंबई | गेल्या ४५ आर्थिक वर्षांपैकी केवळ ८ वर्षांमध्येच महामंडळाने नफा मिळवला असून, उर्वरित वर्षांमध्ये सातत्याने तोटा झालेला आहे. हे श्वेतपत्रिका सर्वसामान्य नागरिक, शासन, कर्मचार्‍यांसह इतर भागधारकांना ची आर्थिक स्थिती पारदर्शकपणे समजावून देण्याच्या हेतूने मंडळांने एक श्वेतपत्रक जाहीर केली आहे.
 
यात आगामी धोरण निर्णय, खर्चकपात योजना, महसूल वाढ व प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करण्याचे नियोजन नमूद करण्यात आले आहे. श्वेतपत्रकानुसार, महसूल वाढवण्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन बस आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे. त्यामध्ये उच्च दर्जाच्या व्होल्वो बस भाडे तत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. महामंडळाच्या मालकीच्या जागांवर खाजगी वाहनांसाठी इंधन पंप उभारण्यात येणार असून, त्यासाठी इंधन पुरवठादारांशी महसूल वाटप करार केले जाणार आहेत.
 
तसेच, महामंडळाच्या मालमत्ता किंवा मॉडेलवर विकसित केल्या जाणार आहेत. सी-कॅटेगरी मार्गांचे बी-कॅटेगरीत व बी-कॅटेगरीचे ए-कॅटेगरीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गैर-परिचालन उत्पन्नात वाढ, प्रवासी सुविधांचा दर्जा उंचावणे, आणि महसूल वाढीसाठी ठोस उद्दिष्टे निश्चित केली जाणार आहेत.
 
डिजिटल तिकिट प्रणालीद्वारे आणि प्रणालीचा वापर वाढवण्यात येणार आहे. प्रवासी व मालमत्तांच्या सुरक्षेसाठी प्रणाली बसवली जाणार आहे. अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. सध्या सवलत नसलेल्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी भाड्यात सवलत देण्याचा विचार आहे. तसेच कर्मचार्‍यांसाठी राबवण्याची योजना देखील आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0