नागोठणे | उष्णतेच्या वाढत्या प्रभावामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असतानाच रोहा तालुयासह संपूर्ण रायगड जिल्ह्याला अक्षरशः अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. रोहा तालुयातील विविध भागातील परिसरामध्ये मंगळवारी, ६ मे रोजी रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. त्यामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली.
मंगळवारी सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत होती. आकाशात पूर्णतः ढग भरुन आले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास तालुयातील शहरी व ग्रामीण भागातील परिसरामध्ये अचानक विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे रात्री वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्णतेच्या लाटेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीशा थंडावा मिळाला.
अवकाळी पाऊस दाखल झाल्यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांची धांदल उडाली असून शेतकर्यांना उन्हाळी भात पीक, आंबा बागायती, जांभूळ सह अन्य विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर तालुयातील शहरी व ग्रामीण भागातील वीटभट्टी चालकांना देखील अवकाळीचा मोठा फटाका बसला असून उत्पादित विटा पाण्यामध्ये विरघळून खराब झाल्या आहेत. हजारो रुपये गुंतवून तयार केलेल्या विटांचे नुकसान झाल्यामुळे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
तसेच गुरांसाठी साठवून ठेवण्यात आलेला चारा देखील या अवकाळी पावसामध्ये भिजल्यामुळे गुरांचे चार्याअभावी उपासमारी होण्याची शयता आहे. त्याचप्रमाणे काढणीसाठी झालेल्या आंब्यांवर अवकाळी धडकल्यामुळे पीक खराब होऊन उत्पादन घटण्याची भीती अंबा बागायतदार शेतकर्यांना पडली आहे. रोहा तालुयात मंगळवार, ६ मे रोजी रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने धुवांधार हजेरी लावली. रात्री तालुयातील बर्याचशा भागात वादळी वार्यांसह मुसळधार पाऊस दाखल झाला.
अवकाळी पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर शेतकरी तसेच तालुयातील शहरी व ग्रामीण भागातील वीटभट्टी व्यावसायिकांचे देखील या अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाकडून नागरिकांच्या, शेतकर्यांच्या तसेच वीटभट्टी व्यावसायिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.
मंडप व्यावसायिकांचे मोठे नुकसान
जिल्ह्यातील सर्वच तालुयांमध्ये या अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसाचा विविध घटकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान सध्या सर्वत्र लग्न समारंभसुरु आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी मंडप व्यावसायिकांकडून लग्न मंडप उभारण्यात आले आहेत.
रोहा तालुयातील शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ संपन्न होत असतानाच मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक वादळीवार्यासह बरसलेल्या अवकाळी पावसामुळे विवाह समारंभासाठी उभारलेले मंडप भिजल्याने मंडप व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे मंडप व्यावसायिक चिंतीत झाले आहेत.
काही काळ वीज पुरवठा खंडित
तालुयात रात्रीच्या सुमारास अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पाऊस दाखल झाल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरण विभागाकडून तालुयातील बर्याचश्या भागात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.
तालुयातील अनेक गावपाड्यांसह शहरी भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने नागरिकांना काही काळ अंधारात चाचपडत रहावे लागले. याचबरोबर तालुयातील नागोठणे जवळील कानसई येथील महापारेषणच्या ४०० केव्ही क्षमता असलेल्या सबस्टेशनमध्ये या अवकाळीमुळे बिघाड झाल्याचेही सांगण्यात आले.