वारकर्‍यांना टोलमाफी, विम्याचा लाभ

30 May 2025 19:25:31
 mumbai
 
मुंबई | आषाढ महिना जवळ येत असल्याने आता पंढरीच्या वारीचे वेध वारकर्‍यांसह शासन आणि प्रशासनलाही लागले आहेत. त्या दृष्टीने सरकारने वारीच्या तयारीला सुरुवात केली आहे. आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणार्‍या वारकर्‍यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
 
आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकर्‍यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्याविषयीची अधिक माहिती प्रसार माध्यमांना आज देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. वारीसाठी जाणार्‍या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोलमध्ये सवलत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गतवर्षी वारीसाठी येणार्‍या भाविकांना टोलमाफी करण्यात आली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0