अलिबाग समुद्रकिनारी एटीव्ही बाईकची वृद्धाला धडक , पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

26 May 2025 16:04:35
 alibag
 
अलिबाग | अलिबाग नसमुद्रकिनारी शनिवारी (२४ मे) सकाळी एका एटीव्ही बाईकने वृद्ध पर्यटकाला धडक दिली. ज्यात पर्यटक किरकोळ जखमी झाला. या घटनेुळे अलिबाग समुद्रकिनार्‍यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. समुद्रकिनार्‍यावर बेकायदेशीरपणे चालविण्यात येणार्‍या या गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी यानिमित्ताने केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, एटीव्ही बाईकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.
 
यापूर्वीही अलिबाग बीचवर असाच प्रकार घडला होता. तेव्हा एटीव्ही बाईकने उंटाला धडक दिल्याने उंट उधळला होता व उंटावर बसलेले पर्यटक खाली पडून जखमी झाले होते. वारंवार घडणार्‍या या दुर्घटनाुंळे स्थानिक आणि पर्यटकां ध्ये नाराजी पसरली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शासनाची कुठलीही परवानगी नसताना या एटीव्ही बाईक समुद्रकिनार्‍यावर बेदरकारपणे चालवल्या जातात.
 
एखाद्या पर्यटकाला अपघात झाला तर त्याला दमदाटी केली जात असल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा समोर आले आहेत. त्यामुळे चालकांसाठी कडक नियमावली आणि प्रशिक्षणाची गरज असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. स्थानिक प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचेही या अपघातातून दिसून येते. या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.
 
प्रशासन यावर आता काय पावले उचलेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पर्यटकांनीही समुद्रकिनारी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. चिंताजनक बाब म्हणजे या वाहनांची नियमित तपासणी केली जात नाही. त्यामुळे धोकादायक अवस्थेत या गाड्या व्यवसायासाठी आणल्या जातात. त्यामुळे अपघात होतात. १२ ते १४ वयोगटातील मुलेही या व्यवसायासाठी वापरली जातात. वेगमर्यादेचे उल्लंघन केले जाते. गाड्यांचा आवाज मोठ्याने यावा, यासाठी सायलेन्सरमध्ये बदल करून घेतले जातात. यामुळे कानठळ्या बसतील येवढे आवाज या गाड्या करतांना दिसतात. गाड्या कुठल्या क्षेत्रात चालवाव्यात, याचे निर्बंध अस्तित्वात नाहीत. त्यामुळे पर्यटकां धून कुठेही या गाड्या चालविल्या जात आहेत.
एटीव्हीबाबत शासन स्तरावर धोरणच
अस्तित्वात नसल्याने अनिर्बंधपणे हे व्यवसाय सुरु आहेत. एटीव्ही अर्थात ऑल टरेन बाईक या गाड्या खेळण्यांच्या प्रकारात मोडतात, त्यामुळे या गाड्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रजिस्ट्रेशन लागत नाही. गाड्यांची तपासणी केली जात नाही. कुठल्याही विभागाची व्यवसायासाठी परवानगी घेण्याची गरज पडत नाही.
 
व्यवसायासाठी नियम आणि अटी अस्तित्वात नाहीत. त्यामुळे अनिर्बंध परिस्थितीत हा व्यवसाय किनारपट्टीवर गेल्या दोन वर्षांपासून फोफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या व्यवसायाबाबत शासनाने ठोस धोरण ठरवणे आवश्यक आहे .
 
Powered By Sangraha 9.0