अलिबाग | मासेारी बंदी कायद्यानुसार १ जूनपासून खोल सम ुद्रातील मासेारी बंद होणार आहे; मात्र कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांवर त्यापूर्वीच मासेारी नौका बंदरात सुरक्षित नांगरुन ठेवण्याची वेळ आली आहे. किनारपट्टीलगतच्या समुद्रात सायंकाळच्या दरम्यान मुसळधार वारे वाहत आहेत.
त्यामुळे मच्छिमारांनी खबरदारी म्हणून आपल्या नौका बंदरात आणून ठेवल्या आहेत. हंगामातील शेवटचे दिवस महत्वाचे असतात, या दिवसात जास्तीत जास्त मासळी पकडून हंगामातील नुकसान कमी करण्याचा प्रयत्न असतो; परंतु सध्याच्या हवामानामुळे मच्छिमारांचे शेवटचे तीन आठवडे फुकट जाणार आहेत.मान्सून कालावधीत समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मासेारी बोटींना नुकसान होण्याची जास्त शयता असते.
त्याचबरोबर हा कालावधी मत्स्यजीवांचा प्रजननांचा असतो. खोल समुद्रातील मत्स्यजीव अंडी घालण्यासाठी किनार्यालगत आलेले असतात. याच कालावधीत त्यांची होणारी शिकार थांबवण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने ही बंदी घातली जाते. पश्चिम किनारपट्टीवर मासेारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत दरवर्षी लागू केला जातो. मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी अद्याप या बंदी कालावधीची अधिसूचना जारी केलेली नाही.
तरीही येथील मच्छिमारांना आपल्या नौका वादळी वार्यामुळे बंदरात आणून ठेवाव्या लागल्या आहेत. गेल्या दोन तीन आठवड्यांपासून वातावरण सारखे बदलत आहे. वादळी वार्यांसह अवकाळी पाऊस पडतोआहे. हवामान विभागाकडून वादळाच्या सूचना सुरुच आहेत. त्यामुळे मच्छिमारांनी मासेारीस जाण्याचे टाळले आहे. बुधवार, गुरुवारी जोराच्या वार्यामुळे अलिबाग, साखर आक्षी, बोडणी येथील नौका समुद्रात भरकटल्या होत्या. काहींचे नुकसानदेखील झाले.
नौकांवर काम करणार्या कामगारांच्या हाताशी काम नसल्याने त्यांचे देखील नुकसान होत आहे. हवामान शांत झाल्यानंतर मासेारी व्यवस्थित होईल, याबद्दलही कोणतीच शोशती नसल्याने हे परप्रांतिय कामगार आपल्या गावाकडे रजेवर जाण्याची तयारी करु लागले आहेत. वादळी परिस्थितीने जिल्ह्यात सुारे ७ हजार २०० मच्छिमारी नौका किनार्यावर विसावल्या आहेत. १ जून ते ३१ जुलैपर्यंत खोल समुद्रातील मासेारी बंदीचा हा कालावधी असल्याने मच्छिमारांनी आपल्या मच्छिमारी नौका समुद्र किनारी नांगरून ठेवल्या आहेत.
का लागू होते मासेारी बंदी?
जून - जुलै हा माशांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा कालावधी असतो. या महिन्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे १ जून ते ३१ जुलै यादरम्यान खोल समुद्रातील मासेारीवर शासनाचे बंधन असते. मच्छिमार बांधवही या काळात खोल समुद्रातील मासेारी करत नाहीत. या दोन महिन्यांच्या काळात ते आपल्या होड्यांची दुरूस्ती, रंगरंगोटी, जाळी सुधारणे अशा प्रकारची कामे करतात.
जीवावर उदार होऊन मासेारी करणारा दर्याच्या राजा हा नेहमी उपेक्षीतांचे जीणे जगत असतो. शासनाने या कोळी बांधवांसाठी अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष फायदा मिळण्यास खूप वेळ जातो. शेतकर्यांप्रमाणे ही नुकसान भरपाई लगेचच मिळत नाही. - गजा कुंडी, मच्छिमार कार्यकर्ता