मुलीचे प्रेम तोडण्यासाठी आई-वडिलांची काळी जादू , अल्लाह लिहून विटा विहीरीत टाकल्या...

अलिबाग-रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By Raigad Times    14-May-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | विटेवर अल्लाह लिहून विहिरीत टाकल्या... लोकांनी पाहिले आणि त्या म 1. मुस्लिम जोडप्यावर मार खायची वेळ आली.. पोलीस आले, वस्तुस्थिती समजली. मुलीचे प्रेम तुटण्यासाठी आई-वडिलांनी ही काळी जादू केली होती. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील ही घटना आहे. तोपर्यंत विहिरीत विष टाकण्यात आल्याची अफवा गावभर पसरली होती.
 
अखलाक अयुब खान आणि त्याची पत्नी रेश्मा अखलाक खान (राहणार नेरूळ नवी मुंबई) यांची मुलगी सादिया (वय २३ वर्षे) हिचे तुर्भे येथील एका मुलासोबत प्रेमसंबंध आहेत. त्या मुलाशी लग्न करुन देण्यास या दाम्पत्याचा विरोध आहे. पण ती मुलगी त्याच मुलाशी लग्र करण्यासाठी तगादा लावत आहे. आई वडील हे आपल्याला पसंत असलेल्या मुलाबरोबर लग्न लावून देत नसल्याने सादियाने आत्म हत्येचा प्रयत्नही केला होता.
 
त्यानंतर अखलाक खान याने कल्याण येथील मांत्रिकाकडे धाव घेतली. सदर मांत्रिकाने अखलाक खान याला २१ विटा घेऊन त्यावर अल्लाहचे नाव लिहून मंत्रतंत्र करुन देऊन ते २१ विहिरीत टाकण्याबाबत सांगितले. त्यावरून अखलाक खान याने काही विटा नेरुळ नवी मुंबई येथे विहिरीत टाकल्या होत्या. परवा ते दोघेजण म ेव्हणीच्या लग्नकार्यासाठी मुरुड तालुक्यातील चोरढे येथे आले होते. यावेळी त्यांनी रेवदंडा येथे उतरुन भाड्याने रिक्षा घेतली.
 
चोरढे येथे जात असतांना रस्त्यात येणाऱ्या विहिरीमध्ये कल्याण येथील मांत्रिकाने मंतरुन दिलेल्या विटा टाकून ते ताडगाव येथे आले. ताडगाव येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीत विट टाकत असताना ग्रामस्थांनी पाहिले. अखलाक अयुब खान यास विचारणा केली; मात्र त्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास न बसल्याने ग्रामस्थानी तातडीने रेवदंडा पोलीस ठाण्यास माहिती दिली. माहिती माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.
 
त्यांनी खान दांपत्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी रेवदंडा पोलीस ठाण्यात आणले. विहिरीत घातपाताच्या उद्देशाने सुरुवातीला ग्रामस्थांमध्ये विष टाकल्याच्या संभ्रम निम णि झाला. त्यामुळे भाजपचे जिल्हा चिटणीस महेश मोहिते, कोर्लई सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ यांच्यासहित मुरुड तालुक्यातील ताडगाव व परिसरात असलेल्या गावातील शेकडो ग्रामस्थ यांनी रेवदंडा पोलीस ठाण्याबाहेर एकत्र जमून अखलाक खान याला जाब विचारला. यावेळी ग्रामस्थांच्या मनातील शंका दूर करण्याकरिता रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत किरवले यांनी सदर विहिरीतील पाणी ग्रामस्थांना पिऊन दाखवले. अखलाक खान यानेदेखील पाणी पिऊन दाखवले.