कर्जत | बुद्ध पौर्णिमेला देशभरात प्राणी गणना केली जाते. कर्जत आणि खालापूर तालुयातील काही भाग आदी १३ ठिकाणी चांदण्या रात्री प्राणी गणना करण्यात आली. यावर्षीच्या प्राणी गणनेत आनंदची बाब वन विभाग यांच्यासाठी ठरली आहे. तब्बल दोन ठिकाणी बिबट्याचे अस्तित्व दिसून आले असून मांडवणे रेंजमधील हुमगावचे जंगलात पाणवठ्यावर आलेला बिबट्याचे दर्शन झाले. दरम्यान, गेली काही दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे तालुयात बहुसंख्य ठिकाणी जंगलात पाण्याचे साठे निर्माण झाले आहे.
त्यामुळे प्राणी जंगलातून पाणवठ्यावर पाण्यासाठी बाहेर आले नसल्याची शयता आहे. कर्जत तालुयात प्राणी गणनेसाठी कर्जत वन विभागाच्या तिन्ही विभागाचे माध्यमातून नियोजन करण्यात आले होते. कर्जत पूर्व विभागामध्ये पाच तर कर्जत पश्चिम विभागात चार आणि माथेरान नेरळ विभागात चार ठिकाणी प्राणी गणना करण्यासाठी जंगलातील पाणवठ्याच्या ठिकाणी मचाण बनविण्यात आले होते. बुद्ध पौर्णिमेचे सायंकाळपासून दुसर्या दिवशी दुपारपर्यंत ही प्राणी गणना करण्याचे नियोजन केले होते.
माथेरान नेरळ वन विभागात वन क्षेत्रपाल उमेश जंगम यांच्या नेतृत्वाखाली वनपाल एस.एस. म्हात्रे आणि राजवर्धन आढे यांनी प्रत्येकी दोन ठिकाणी प्राण्याच्या येण्याकडे लक्ष ठेवले होते. माथेरान जंगलातील शार्लोट लेक आणि सिम्पसन टँक या ठिकाणी प्राणी गणना करण्यासाठी वन कर्मचारी तैनात होते. तर नेरळ भागातील जुम्मापट्टी येथे राठी भागात तर लव्हालवाडी येथे वन क्षेत्र प्लूटो ५० मधील पाणथळ या ठिकाणी रात्रभर कर्मचारी थांबून होते.
त्यात माथेरानमध्ये भेकड, रान डुक्कर आदी प्राणी पाणी पिण्यासाठी आल्याचे वन क्षेत्रपाल जंगम यांनी दिली. खरालाचे पाणी येथे दिसला बिबटा ... कर्जत पूर्व भागातील चार ठिकाणी प्राणी गणना करण्यात आली. त्यात मांडवणे वन क्षेत्रातील हुमगाव येथील खराळाचे पाणी या ठिकाणी जंगल भागात असलेल्या पाणवठ्यावर रात्री बिबट्या पाणी पिण्यासाठी आल्याची नोंद तेथील वन कर्मचारी वनपाल विष्णू थोरात, तसेच वन कर्मचारी शंकर पवार, श्रीरंग काकडे आणि वन मजूर खरात यांच्या नजरेस पडला अशी माहिती वन अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.
त्याचवेळी सोलनपाडा पाझर तलाव परिसरात प्राणी गणना कर्मचारी यांना बिबट्याच्या वास्तव्याचे ठसे आढळून आल्याची नोंद करण्यात आली. त्या ठिकाणी वनपाल के.डी. लांगी यांचे पथक तर अन्य प्राणी गणना क्षेत्र हे खांडपे येथील पाझर तलाव येथे वनपाल दत्तात्रय केवारी आणि ढाक येथे दुर्गम भागात हिम्मत पाटील यांचे पथक रात्रभर तैनात होते.