पाकिस्तानमधील दोन कोटी लोकांचे भारताला समर्थन

13 May 2025 13:11:33
 delhi
 
नवी दिल्ली | भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे, सात मे रोजी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त झाले असून, १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. दरम्यान त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान युद्ध व्हावं की नको? यावर पाकिस्तानमधील जनतेचा कौल सांगणारा एक सर्व्हे समोर आला आहे.
 
पाकिस्तान सरकारला हादरून सोडणारा असा हा सर्व्हे आहे, या सर्व्हेध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील तब्बल २ कोटी लोकांनी जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर आम्ही पाकिस्तानला साथ देणार नसल्याचं म्हटलं आहे.
 
हा सर्व्हे पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबमधील काही जिल्ह्यांध्ये करण्यात आला होता. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले होते, भरतानं दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांवर हल्ला केला.
 
 
Powered By Sangraha 9.0