कर्जत | माथेरानला पाणीपुरवठा करणार्या ब्रिटीशकालीन शार्लोट लेक संवर्धनाचे काम राज्य सरकारच्या मुख्यमंत्री तलाव सुशोभीकरण योजनेतून सुरु आहे. तलावातील गाळ काढण्याचे आणि तलाव मजबूत करण्याचे काम माथेरान नगरपरिषदेकडून नेमलेल्या ठेकेदार यांच्या माध्यमातून करून घेत आहे.
दरम्यान या तलावातील गाळ काढण्यात यावा यासाठी माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने तसेच माथेरान स्टॉलधारक समिती यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला होता. माथेरान शार्लोट लेक हा तलाव खोडाला आणि पाणी साठवून ठेवण्याचे काम केले. ब्रिटिशांनी बांधलेल्या या शार्लोट लेकची साफसफाई माथेरान नगरपरिषदेकडून मागील काही वर्षे करण्यात आली नाही.
पिण्याच्या पाण्याचे दृष्टीने शार्लोट लेक महत्वाचा आहे. दरवर्षी पावसाळा सुरु होण्यासाठी माथेरान नगरपरिषदेकडून तलावातील कचरा उचलण्याचे काम सफाई कामगार यांच्याकडून करून घेतले जाते. २०१४ मध्ये नानासाहेबधर्मधिकारी प्रतिष्ठानकडून हजारो श्री सदस्य यांच्या माध्यमातून शार्लोट लेकची साफसफाई करण्यात आली होती. त्यानंतर पुढे दहा वर्षे चा कालावधी लोटला आहे. मात्र पालिकेने या तलावाची स्वच्छता केलेली नाही.
दोन वर्षांपूर्वी तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने आडकाठी केल्यानंतर ऐन पावसाळ्यात शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम रद्द झाले होते. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तलावातील गाळ काढण्याची मागणी लावून धरली होती. या तलावातील गाळ काढण्यात यावे आणि धरण मजबूत करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यषकः संतोष कदम यांच्या कडून तसेच माथेरान निसर्ग पर्यटन संस्था यांच्या कडून आवाज उठवण्यात आला होता.
त्यावेळी करण्यात आलेल्या उपोषणाच्या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी संबंधित तलावातील गाळ काढण्याच्या आणि तलावाचे संवर्धन करण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे असे सांगितले होते. सदर तलाव माथेरान नगर परिषदेच्या मालकीचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अमृत-२ कार्यक्रमांतर्गत माथेरान नगरपरिषदेकडून माथेरान शार्लोट तलाव सुशोभिकरण करणे या कामाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. सदर कामासाठी रु.४९९.८२ लक्ष किंमतीच्या अंदाजपत्रकास अधीक्षक अभियंता यांनी मान्यता दिली असून या कामाला जानेवारी २०२५ पासून सुरुवात झाली असुन एक महिन्यावर पावसाळा आल्याने माथेरान पालिकेने त्या कामाच्या पूर्णतावासाठी ठेकेदाराला सूचना कराव्यात अशी मागणी संतोष कदम यांनी ऐकली आहे.
पर्यटन व्यवसायासाठी पुरेशा पाण्याची उपलब्धता महत्वाची असून पर्यटक व्यवसायामध्येही मोठा वाढ होईल. सध्या सुरु असलेल्या गाळ काढण्याच्या कामात वन विभघग यांच्याकडून लावण्यात येत असलेली झाडे लावण्यासाठी वापरलेली साहित्य तसेच ओला कचरा चिखल धरण क्षेत्रातून बाजूला करणे हे वन विभागाचे काम आहे. त्यातून तलावाची साफसफाई केल्यास तलाव सुशोभिकरणास मदत होईल तलाव मातीने भरलेला होता आणि एक सर्व कच्च्या मालाची साफसफाई करते ज्यामुळे तलावाचा साठा वाढविण्यात खरोखर मदत होईल ज्यामुळे कमीतकमी दोन महिन्यांच्या अतिरिक्त पाण्याचा फायदा होईल -संतोष कदम, अध्यक्ष माथेरान शहर मनसे