नवी मुंबई विमानतळ नामकरण अधिसूचना काढा , २४ जूनपासून भूषण पाटील यांचे जासई येथे आमरण उपोषण

By Raigad Times    07-Jun-2025
Total Views |
 uran
 
उरण | दिवगंत लोकनेत दि.बा. पाटील याचें शिष्य तथा जऐ नपीटीचे माजी विेशस्त, कामगार नते म्हणनू सवार्नां सपु रिचित असलले भषूण पाटील हे नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसचूना (नोटीफिकेशन) ताबडताबे काढून सदर विमानतळाचे लोकनेत े दि.बा. पाटील असे नामकरण करावे या प्रमखु मागणीसाठी दि. २४ जनू (लोकनेते दि.बा. पाटील याचां १२ वा स्मृंती दिन) पासनू जासई यथे आमरण उपोषण करणार आहते.
 
दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांचे जासई हे जन्मगाव आहे. या जासई गावात दि.बा. पाटील यांच्या पुतळ्यासमोर जासई हायस्कूल, ता. उरण, जि. रायगड येथे भूषण पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत. सन २०२० पासून गेली ५ वर्ष नवी मुंबई, आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती तर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आंदोलन चालू आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नामकरणबाबत दोन वेळा निर्णय घेण्यात आला आहे व तसा आशयाचा ठराव मंजुरीसाठी १६ जुलै २०२२ रोजी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
 
त्यानंतर याबाबतीत अनेक पाठपुरावा बैठका झाल्या आहेत. लवकरात सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा येथील जनतेला होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव लागावे यासाठी चातकासारखी जनता वाट पाहत आहे. परंतु आज तारखेपर्यंत नामकरणाचा निर्णय मंजूर झाला नाही, तसेच नामकरणाबाबत अधिसूचना (नोटीफिकेशन) काढण्यात आली नाही.प्रचंड विलंब झाल्यामुळे येथील जनतेच्या मनात संभ्रम, अविेशास व असंतोष निर्माण झालेला आहे. आता जनतेच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे.
 
गेल्या १७ एप्रिलला उद्घाटन होणार होते, ते झाले नाही. त्यानंतर १५ मे, जून महिन्यात व आता १५ ऑगस्ट २०२५ रोजी उद्घाटन होणार आहे अशी माहिती मिळत आहे. अशा वारंवार तारीख पे तारीख होत आहेत. घोषणावर घोषणा होत आहेत. ओशासन सुद्धा देण्यात येत आहेत. परंतु आजपर्यंत नावाची अधिसूचना निघाली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांच्या नामकरणाची अधिसुचना ताबडतोब काढण्यात यावी.
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात विस्थापित, प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना प्रशिक्षण व रोजगार देण्यात यावीत या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भूषण पाटील यांनी दिली आहे. सदर मागण्या २३ जून २०२५ पर्यंत मान्य न झाल्यास २४ जून २०२५ सकाळी १० वाजल्यापासून जासई येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार असेल असा इशारा भूषण पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. मागण्या मान्य झाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा आक्रमक पवित्रा भूषण पाटील यांनी घेतला आहे. जासई येथे आमरण उपोषण करत असल्याचे पत्रव्यवहार भूषण पाटील यांनी संबधीतांकउे केला आहे.