पोलादपूर | जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव हद्दीत रस्त्यावर भेगा पडल्याची बातमी एप्रिल महिन्याअखेरीस ‘रायगड टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता स्थानिक ग्रामस्थवर्ग रूंदावणार्या भेगांमुळे खडबडून जागा झाला आहे. पावसाळ्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी हा प्रकार गांभीर्याने विचारात घेत तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या लक्षात आणून दिला.
यामुळे २७ जून रोजी तहसीलदारांनी संबंधित अधिकार्यांसोबत चर्चा करून घटनास्थळी पाहणी केली व येत्या दोन दिवसांत तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत सूचना दिली. पळचिल ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच उमेश मोरे, रवींद्र जाधव, प्रवीण मोरे, ग्रामस्थ आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भुयारीमार्गे चौपदरीकरण काम करण्यात आले.
यावेळी भोगाव गावाच्या हद्दीत डोंगरांचे उत्खनन करून डोंगर कापण्यात आला. नवीन महामार्ग भुयारामार्गे वळविण्यात आला. याठिकाणी जवळच भोगावच्या हद्दीत जुन्या मार्गावरील रस्त्याला ५ ते १० मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने प्रस्तुत प्रतिनिधीने बातम्यांद्वारे संभाव्य धोयाकडे यंत्रणांचे व ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. या बातम्यांमध्ये पावसाळ्यात येथील रस्ता खचून नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शयता व्यक्त करण्यात आली होती. सद्यस्थितीत कशेडी घाटातील वाहतूक भुयारीमार्गे होत असल्याने कातळी बंगला म्हणजेच कशेडी टॅपच्या जुन्या नायापर्यंत नेणार्या जुन्या महामार्गावर वाहतूक सुरू आहे.

यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा नसला तरी भविष्यात किंवा पावसाळ्यात भुयारामार्गे काही अनुचित प्रकार घडल्यास पुन्हा मूळ कशेडी घाटातील जुन्या महामार्गावरून पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक वळवावी लागणार आहे. यासाठी या जुन्या महामार्गाची देखभाल दुरूस्ती अतिशय महत्त्वाची आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने वेळीच भेगा रूंदावण्यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी सूचना तहसीलदार कपिल घोरपडे यांनी संबंधित अभियंत्यांना केली आहे.
पोलादपूर तालुयातील भोगाव हद्दीतील २००५ च्या अतिवृष्टीत खचलेला रस्ता दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ९० ते १०५ फूट लांब आणि २ ते ५ फूट खोल खचला असून तेथे उभा करण्यात आलेला प्रोकलेनदेखील गरजेनुसार हलविण्यात येत असून यावर्षी कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग सुरू झाल्याने या खचणार्या डेंजर झोनकडे डागडुजी करण्यात अक्षम्य दिरंगाई करण्यात आल्याचे दिसून येत आहे.