पडसरेला जोडणारा पूल धोकादायक अवस्थेत , आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थी, कर्मचारी, पर्यटक, ग्रामस्थांचा जीव टांगणीला

By Raigad Times    27-Jun-2025
Total Views |
 pali
 
सुधागड-पाली | पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधागड तालुयातील पडसरे गावाला जोडणारा पूल अक्षरशः मोडकळीस आला असून अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. हा पूल पडसरे गावाला व येथील आदिवासी आश्रमशाळेला सुधागड तालुयातील सर्व गावांशी जोडतो.
 
परिणामी, पडसरे आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, येणारे पर्यटक व ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. या पुलाचे संरक्षण कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. संरक्षक कठड्याच्या लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहे. याठिकाणी संरक्षण कठडेच उरलेले नाहीत; परिणामी वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळेस याठिकाणी अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
 
पुलाखालील स्लॅब जीर्ण झाला असून स्लॅबच्या सळ्याही बाहेर निघून, खाली लोंबकळत आहेत. एप्रिल २०१८ साली या पडसरे पुलाची व येथील प्रसिद्ध अशा धबधब्याची तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी केली होती व त्यांनी पूल दुरुस्तीबाबत संबंधित विभागाला तात्काळ सूचना दिल्या जातील असे सांगितले होते. मात्र आजतागायत पुलाची कोणतीच डागडुजी केली गेलेली नाही. या पुलाचा वापर पडसरे, लोळगेवाडी, एकलघर, महागाव, देउळवाडी, कवेलेवाडी, कोंडक आदिवासीवाडी, भोप्याचीवाडी, गोमाशी आदिवासीवाडी आदी गावातील नागरिक करतात.
 
pali
 
निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक करतात. या पुलाखालूनच धबधब्याचे पांढरे खळखळणारे पाणी वाहते. या मार्गावर वाहनांची वर्दळ सुरु असते. पादचारी नागरिकांचीही रेलचेल सुरु असते. पडसरे आदिवासी आश्रमशाळेचे विद्यार्थी याच पुलावरुन ये-जा करतात. त्यामुळे येथील रस्ते व नदी पूल सुस्थितीत व सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पडसरे पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी व सर्वांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी केली आहे.
या पुलाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. हा पूल कधीही कोसळू शकतो, अशी परिस्थिती आहे. गेली तीन ते चार वर्षे पाठपुरावा करूनदेखील हे चित्र कायम आहे. शासन एखादा अपघात होण्याची वाट पहात आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने पडतो. तरी शासनाने वेळीच दखल घेऊन या पुलाची दुरुस्ती करावी किंवा या ठिकाणी नवीन पूल बांधावा -रविंद्र लिमये, अध्यक्ष, कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ, पाली