राबगाव/पाली | अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिक व भाविक अक्षरशः बेजार झाले आहेत. येथील बाह्यवळण मार्गाला मान्यता मिळून १४ वर्षे होत आली आहेत, मात्र अनेक अडचणीमुळे त्याला पूर्ण होण्यास अजून काही मुहूर्त सापडलेला नाही.
बाह्यवळण मार्ग झाल्यास येथील वाहतूक कोंडीची समस्या बहुतांशी सुटेल. मागील १३ वर्षांपासून रायगड टाइम्स या संदर्भात बातम्यांच्या माध्यमातून लक्ष वेधत आहे. पालीत नेहमीच भाविकांची गर्दी असते. रोज हजारोच्या संख्येने भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होत आहेत. त्याबरोबरच पाली हे तालुयाचे ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त व विद्यार्थी शाळा व कॉलेजमध्ये येत असतात.
त्यातच पालीतील अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, अवैधरीत्या पार्क केलेली वाहने व अनधिकृत बांधकामे यामुळे पालीत वारंवार वाहतूक कोंडी होते. परिणामी वाहनचालक, भाविक, पादचारी व विद्यार्थ्यांची येथून वाट काढताना मोठी गैरसोय होत आहे. येथील बल्लाळेेशर मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल, जुने एस.टी.स्टँड, गांधी चौक, मारुती मंदिर, बाजारपेठ, हाटाळेेशर चौक, मारुती मंदिर अशा बहुतांश ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते.
असंख्य कारणांमुळे पोलिसांनी या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. बल्लाळेेशर मंदिर परिसरात बल्लाळेेशर देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तैनात असतात. अनेक वेळा वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहोचण्यास उशिर होतो. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बाह्यवळण (बायपास) मार्ग लवकर करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांकडून वारंवार होत आहे.
बाह्यवळण मार्ग
सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आखत्यारित हा मार्ग होणार आहे. राज्यशासनाने सन २०१० या वर्षी या रस्त्याला मान्यता दिली आहे. तसेच त्यावेळी रस्त्यास १८ कोटी तर भूसंपादनासाठी १० कोटींची मंजुरी मिळाली होती.
सदरचा मार्ग वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग ५४८(ए) व पाली पाटणूस राज्यमार्ग ९४ ला जोडला आहे. यासाठी बलाप, पाली, बुरुमाळी व झाप या गावातील एकूण ९ हेटर जागा लागणार आहे.
...तर कोंडी सुटेल!
पाली गावातील रस्ते रुंदिकरण होणे अवघड आहे.त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाह्यवळण रस्ता काढणे हा एकमेव पर्याय आहे. बाह्यवळण मार्ग लवकर सुरु व्हावा यासाठी फारसे कोणी पाठपुरावा करताना दिसत नाही. बाह्यवळण मार्ग झाल्यास मोठ्या गाड्या पालीत येणारच नाहीत.
त्यामुळे बरीचशी वाहतूक कोंडी कमी होईल. बलाप गावावरुन थेट बल्लाळेेशर मंदिराच्या पाठीमागे झाप गावाजवळ बाह्यवळण मार्ग प्रस्तावित आहे. त्यासाठी शासनाची मंजुरी देखिल मिळाली आहे. परंतु हा पर्यायी मार्ग अजूनही लालफितीत अडकला आहे.