आणीबाणी कालखंडाविषयी कार्यक्रमातून लोकशाहीचा जागर

By Raigad Times    24-Jun-2025
Total Views |
 panvel
 
नवी मुंबई | २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू झाली. त्या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत असताना, देशभरात त्या काळाची स्मृती जागवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या निर्दे शानुसार देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
 
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही राज्य शासनाच्या सूचनांनुसार आणीबाणी कालखंडातील ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेणारा उपक्रम राबविण्यात येत आहे. दि. २५ जून २०२५ रोजी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी करण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यात ठिकाठिकाणी केंद्र सरकारमार्फत प्रदर्शित करण्यात आल्याप्रमाणे आणीबाणी विशेष स्मरण प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.