म्हसळ्यात विजेच्या धक्क्याने ३ गुरे दगावली , शेतकर्‍याचे गोधनाचे नुकसान; भरपाई मिळण्याची मागणी

By Raigad Times    23-Jun-2025
Total Views |
 mhasla
 
म्हसळा | तालुयातील कुडतुडी गौळवाडी येथील शेतकरी अिेशनी अशोक कासार यांच्या मालकीचा बैल, गाय आणि दुसरे शेतकरी शंकर लक्ष्मण मिरगल यांची गाय अशी तीन गुरे गावाशेजारील जंगलात चरायला गेली असता वीजवाहिनीची तार तुटून पडल्याने दगावली.
 
ओला चारा खात असताना तुटून पडलेल्या वीजवाहिनीचा तीव्र धक्का बसल्याने दोन गाई व एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. ऐन शेतीच्या हंगामात कुडतुडी येथील शेतकर्‍यांचे गोधनाचे नुकसान झाले असून, भरपाईची मागणी जोर धरत आहे. ज्या ठिकाणी गुरांना विजेचा धक्का लागला त्या ठिकाणी पाणवठाकडे जाण्याचा मार्ग आणि शेतकर्‍यांची शेतात जाण्याची रहदारी असते; परंतु दैव बलवत्तर म्हणून बाका प्रसंग टळला.
 
माणसावरील संकट मुया जनावरांवर बेतले. घटनेची माहिती मिळताच तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकरी, तलाठी, विज वितरण कंपनीचे अभियंता, पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी व रितसर पंचनामा करून वीज वितरणकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना योग्य ती भरपाई देण्यात येणार असल्याचे सहाय्यक अभियंता गुगलकर यांनी सांगितले. दरम्यान, पावसाच्या या दिवसांमध्ये वारंवार घडणार्‍या या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.