उरणमधील खाडीकिनार्‍यावरील खारफुटीसह जैवविविधता धोक्यात

By Raigad Times    02-Jun-2025
Total Views |
 uran
 
उरण | उरण तालुयातील अंतर्गत गावांना समृद्ध खाडीकिनारा लाभला आहे. खारफुटीच्या जंगलासह मुबलक प्रमाणात जैवविविधता लाभली आहे. मात्र गावाबरोबर रस्त्यालगत असलेल्या खाडीकिनार्‍यावर गोदाममालक तसेच व्यावसायिक मोठ्या प्रमाणात डेब्रिज, मुरुम, मातीचा भराव टाकून खाडी बुजवून पाणथळ क्षेत्र, खारफुटीची वने नष्ट करत आहेत. त्यामुळे खाडीकिनार्‍यावरील खारफुटी व जैवविविधता धोयात येऊन गाव परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
 
शासनाने खारफुटी (कांदळवन) वनविभागाकडे हस्तांतरित केले आहे. मात्र उरण तालुयातील वन विभागाचे अधिकारीवर्गाकडून शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र उरण तालुक्यातील खाडीपरिसरात दिसून येत आहे. सद्यःस्थितीत तालुयातील चिर्ले, वेेशी, दिघोडे, विंधने, पागोटे, नवघर, खोपटा, धुतूम, सोनारी, करळ, जासई, बोकडविरानवीन शेवा, चाणजे, सोनारी, जसखार, नवघर, पाणजे सह इतर गावालगतच्या खाडीकिनार्‍यावरील खारफुटीची कत्तल करून त्याठिकाणी डेब्रिज माती, मुरुम चा भराव केला जात आहे.
 
तसेच फ्लेमिंगोसह इतर पक्षांची पाणथळ क्षेत्रही नष्ट केली जात आहेत. यासंदर्भात दक्ष नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी वन विभाग व इतर शासकीय कार्यालयात तक्रार दाखल केली. मात्र सदर तक्रारींकडे शासन यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. खाडीकिनार्‍यावरील खारफुटी व जैवविविधता धोयात आली असून येणार्‍या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
उरण तालुयातील खाडीकिनार्‍यावरील खारफुटी व पाणथळ क्षेत्र वाचविण्यासाठी शासनाने व प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. -महेश भोईर, पर्यावरणप्रेमी आणि सर्पमित्र