कर्जत | अवकाळी पावसाने भातपिकाचे नुकसान , पंचनामे होत नसल्याने शेतकरी नाराज

खरीप हंगामातील शेतीचा प्रश्न शेतामधील पाण्याने आणखी जटील

By Raigad Times    13-Jun-2025
Total Views |
KARJT
 
कर्जत | तालुयात उन्हाळी भात शेती केली जाते आणि त्या भात शेतीचे उत्पन्न मिळण्याची वेळ आणि मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे दुबार शेती वाया गेली आहे. दुबार शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान भात पीक पाण्यात भिजल्याने झाले असून शेतकर्‍यांच्या या पिकाची नुकसान भरपाई बाबत शासनांकडून पंचनामे करण्याचे धोरण आहे, मात्र कर्जत तालुयात पंचनामे होताना दिसत नाहीत.
 
दुसरीकडे मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर मे अखेरपर्यंत अवकाळी पाऊस सुरु होता आणि त्यामुळे कर्जत तालुयातील भाताची सर्व शेत पाण्याने भरली असून अजूनही त्या भात लागवड करायच्या शेतात पाणी आणि गवत असल्याने बियाण्याची पेरणीकशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जत तालुयात दुबार शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात राजनाला कालव्याचे पाण्यावर यावर्षी एक हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली होती. तर तालुयातील सहा पाझर तलाव आणि दोन लघुपाटबंधारे प्रकल्प यांच्या कालव्याच्या पाण्यावर देखील तालुयाच्या विविध भागात दुबार शेती केली होती.
 
या दुबार भात शेतीचा कापणी आणि मळणी हंगाम हा साधारण मे महिन्यात सुरु होतो. भाताचे पीक शेतात तयार झालेले असताना सहा मेपासून बहुसंख्य ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे भात पिकाची नासाडी झाली. हा अवकाळी पाऊस मे महिन्यात शेवटपर्यंत सुरु होता आणि त्याचा परिणाम पावसाच्या पाण्याने दुबार शेती केलेल्या भात पीक असलेल्या शेतात पाणीच पाणी साठून राहिले होते. त्या पाण्यामुळे दुबार शेती करणारी शेतकर्‍यांचे शेतात पाणी असल्याने भात पिकाची कापणी करण्यात अडचणी आल्या. तर काही शेतकर्‍यांनी भात पीक कापणी न करता तसेच सोडून दिले आहे.
 
अवकाळी पावसाने दुबार भात शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानीबद्दल शासनाने पंचनामे करून शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळेल, असे कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत जाहीर केले होते. मात्र तालुयातील दुबार शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसान पंचनामे झालेले नाहीत. त्यांच्याकडून कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी केवळ सातबारा आणि अ हे उतारे घेतले असून स्थळ पंचनामे करण्याची कोणतीही कार्यवाही कृषी विभागाने केलेली नाही अशी तक्रार राजनाला कालवा परिसरातील शेतकरी करीत आहेत.
 
पंचनामे करण्याची मागणी करून देखील कृषी तसेच महसूल विभाग कानाडोळा करीत असल्याने दुबार शेती करणारे कर्जत पूर्व भागातील शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतात कोसळलेले आणि अवकाळी पावसाच्या पाण्याने कुजून पडलेले भाताचे पीक तसेच ठेवून दिले आहेत, मात्र पंचनामे होत नसल्याने शेतकरी नाराज आणि आर्थिक दृष्ट्या संकट आले आहेत.
नवीन समस्या
अवकाळी पावसाने दुबार शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे नुकसान केले आहे,त्याचप्रमाणे खरीप हंगामात शेती करण्याची तयारी करणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतात एक महिना आधी पडलेल्या पावसामुळे गवताने ती सर्व शेत व्यापली आहेत. त्याचवेळी मे अखेर पडणारे पाऊस यामुळे शेतांमध्ये साठून राहिलेले पाणी अजूनही कायम आहे.
 
त्यामुळे भाताच्या बियाणे यांची लागवड कधी करायची असा प्रश्न शेतकर्‍यांच्या पुढे आहे. त्यात पाऊस पडून गेल्यानंतर जमीन ओली होते आणि त्या जमीनीचा वाफसा शेतकर्‍यांना भाताच्या बियाणे यांची पेरणी करण्यासाठी मदतगार ठरत असतो. त्यामुळे शेतामध्ये असलेले पाणी आटून जमीन सुकली नाहीतर मात्र खरीप हंगामात भाताची शेत करणे कठीण होऊन बसले आहे.
कृषी खात्याने आमचे जमिनीचे उतारे घेतले आहेत. मात्र अद्याप पंचनामे केले नाहीत, त्यामुळे आमच्या जमिनींमधील भाताच्या उतपन्नाचे झालेले नुकसान शासन भरपाई देणार आहे काय? यावर्षी आमचे दुबार भाताचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, आम्हाला शासनाने मदत केली नाही तर आम्ही कर्जाच्या खाईत लोटले जाणार आहोत. -दशरथ मुने, शेतकरी