कर्जत तालुयातील पळसदरी ठाकूरवाडीवरील , धोकादायक स्थितीतील दगड पुढील वर्षी हलवणार?

वन विभागाकडून स्थानिक ग्रामस्थांना ओशासन

By Raigad Times    10-Jun-2025
Total Views |
KARJT
 
कर्जत | १९ जुलै २०२३ मध्ये इरसालवाडीवर दरड कोसळली आणि त्यानंतर प्रशासन झोपेतून उठले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी कर्जत तालुयातील पळसदरी ठाकूरवाडीमधील ८० घरांचे स्थलांतर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर दोन वर्षानंतर देखील प्रशासनाला त्या आदिवासी लोकांच्या वस्तीच्या मागे असलेले धोकादायक दगड हलवण्यास वेळ मिळाला नाही. त्यात ते दगड वन जमिनीमध्ये असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला हलवता येत नाहीत.
 
मात्र तहसीलदार यांनी ते दगड हलवण्याचे आदेश दिल्यानंतर वन विभागाने सर्व ग्रामनथांना ते दगड हलविण्याबाबत परिस्थितीची माहिती दिली असून ते दगड पावसाळ्यानंतर हलविले जातील असे ओशसन दिले आहे. दरम्यान पळसदरी ठाकूरवाडीवर कधीही कोसळतील अशा स्थितीत असलेले दगड आता पावसाळ्यानंतरच हटवले जाणार हे जवळपास नक्की झाले आहे. इरसाळवाडी येथे जुलै २०२३ मध्ये दुर्घटना घडल्यानंतर कर्जत-खोपोली राष्ट्रीयमहामार्ग रस्त्यावर असलेल्या पळसदरी ठाकूरवाडीचे मागे धोकादायक स्थित असलेले दगड खाली कोसळतील अशा स्थितीत आहेत.
 
असे दगड असताना ते काढण्यासाठी ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहे. ते दगड हलवावेत यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एप्रिल २०२४ मध्ये तहसीलदार यांना अर्ज दिले होते. मात्र प्रशासन सहकार्य करीत नसल्याने वाडीवर कोसळण्याच्या स्थितीत असलेले दगड हलविण्यात आलेले नव्हते. मात्र ते सर्व दगड हलविण्यात वन जमिनीचा अडथळा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या पाहणी मध्ये स्पष्ट झाले होते.
 
त्यामुळे शेवटी तहसीलदार कर्जत डॉ धनंजय जाधव यांनी वन विभाग यांना ते दगड हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मौजे पळसदरी आदीवासीवाडी येथील टेकडीलगत राखीव वन स.नं. ४३ मध्ये असलेले ३ मोठे दगड धोकादायक दगड यांची पाहणी वन विभागाने केली संबंधित क्षेत्र वनखात्याच्या अखत्यारीत असलेने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गटविकास अधिकारी कर्जत व ग्रामविकास अधिकारी पळसदरी यांचेशी समन्वय साधून तातडीने सदरचे दगड पारंपारीक दगड फोडणार्‍या व्यकर्तीच्या सहकार्याने मान्सून आगमन होण्यापूर्वी शय तितया जलद गतीने फोडून हटवावे यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरु केले.
 
मुरबाड आणि लोणावळा येथून दगड फोडणारे कामगार यांना आणण्यात आणले. मात्र ते दगड फोडण्यासाठी अवधी कमी असल्याने तसेच पाऊस सुरु झाला असल्याने वन विभागाचे वनक्षेत्रपाल समीर खेडेकर यांनी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांच्या समवेत पाहणी केली. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ देखील उपस्थिती होते. ही पाहणी झाल्यानंतर वन विभाग आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी पळसदरी ठाकूर वाडीमध्ये ग्रामस्थांची बैठक घेतली आणि दगड हलवण्यात येत असलेल्या अडचणी यांची माहिती दिली.
 
त्यामुळे आता ते दगड पावसाळा संपल्यावर वन विभाग यांच्या माध्यमातून हलविले जाणार हे ठरवण्यात आले असून वन विभाग ती सर्व कार्यवाही करेल असे ओशासन ग्रामस्थांना देण्यात आले आहे. तसेच हा सर्व अहवाल वन विभागाकडून शासनाला देण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना देण्यात आले आहे.