महाड | गेल्या सात पिढ्यांपासून हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्या किल्ले रायगडावर वास्तव्य करणार्या व गडावर येणार्या शिवभक्तांना न्याहरी भोजनाची व्यवस्था करणार्या ५६ कुटुंबांना केंद्रीय पुरातत्त्व विभागाने अतिक्रमणाचा ठपका ठेवत नोटीसा देत किल्ल्यावरून खाली जाण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे.
पिढ्यान्पिढ्या किल्ले रायगडावर वास्तव्य करून असणार्या धनगर समाजाला पुढील ७० पिढ्या कुणीही हलवू शकणार नाही, अशी भूमिका रोहयो मंत्री ना. भरत गोगावले यांनी घेतली आहे. त्यामुळे गडावरील धनगर समाजाला दिलासा मिळाला आहे. ना. गोगावले यांना धनगर समाजाच्या भगिनींनी पुरातत्व खात्याकडून बजावलेल्या नोटीसांबाबत सांगितले. त्यानंतर ते बोलत होते.