सावंतवाडी | अमहाराष्ट्राचे ’प्रति महाबळेेशर’ म्हणून ओळखल्या जाणार्या आंबोलीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील प्रसिद्ध धबधबे आतापासूनच किंचित प्रवाहित होऊ लागले आहेत. महाराष्ट्राचे ‘प्रति महाबळेेशर’ म्हणून ओळखल्या जाणार्या आंबोलीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील प्रसिद्ध धबधबे आतापासूनच किंचित प्रवाहित होऊ लागले आहेत.
यामुळे लवकरच पर्यटन हंगाम सुरू होण्याची चिन्हे असून, स्थानिक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शयता निर्माण झाली आहे. मात्र, या सार्याची भिस्त पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. आंबोली, गेळे आणि चौकुळ ही तिन्ही गावे त्यांच्या नयनरम्य निसर्ग सौंदर्यासाठी, घनदाट धुयासाठी, फेसाळणार्या धबधब्यांसाठी आणि विपुल जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसह देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीचा पाऊस, धुके आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत असतात. थंड हवेच्या या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते.