अलिबाग| संपूर्ण राज्यासाठी आणि बळीराजासाठी आनंदाची बातमी असून मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तब्बल १२ दिवस आधीच मान्सून तळकोकणातील देवगडमध्ये दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे.
महाराष्ट्रामध्ये साधारण ७ जूनला मान्सून दाखल होतो. मात्र यंदा वेळेच्या आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकर्यांनाही मोठा दिलासा मिळाला.
मान्सून तळकोकणात दाखल
नैऋत्य मान्सूनने भारतात एन्ट्री केली असून केरळ, कर्नाटकचा बहुतांश भाग, संपूर्ण गोवा आणि म हाराष्ट्रातील तळकोकण व्यापला आहे. तळकोकणातील देवगडमध्ये मान्सून दाखल झाला असून पुढचे पाच दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ध्ये मुसळधार पावसाची शयता वर्तवण्यात आली आहे.
कोकण, कोल्हापूरमध्ये मुसळधार
पुढच्या तीन दिवसात मान्सूनसाठी पूरक परिस्थिती असून महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सून दाखल होण्याची शयता मुंबईतील प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढच्या पाच दिवसांसाठी कोल्हापूर, कोकणामध्ये मुसळधार पावसाची शयता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदु्र्ग, रत्नागिरी, रायगडचा काही भाग, तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली-सातार्याच्या काही भागासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण-गोवा (दक्षिण) जिल्ह्यां ध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शयता आहे. तसेच दक्षिण मध्यम महाराष्ट्राच्या घाट भागांध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शयता आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्यम महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाट सुरू आहे. या परिसरात ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाहणारे झंझावाती वारे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शयता आहे. तर मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शयता वर्तवण्यात येत आहे.