कोर्लई | मुरुड तालुयातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील वालवटी गावाला गेल्या सात वर्षांपासून पाणी प्रश्न भेडसावत असून वालवटी पाणी पुरवठा कमिटीतर्फे तहसील कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेले आमरण उपोषण प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याने अखेर स्थगित करण्यात आले.
मुरुड तालुयातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील वालवटी येथील पाणीप्रश्नी जलजीवन मिशन योजनेच्या ठेकेदाराचा कार्यारंभ आदेश रद्द करुन नवीन निविदा काढून आदेश द्यावा, दलित वस्तीमध्ये कोणतेही काम न करता लाखोंचा अपहार करणार्या तत्कालीन सरपंच व अधिकार्यांवर त्वरित गुन्हा दाखल करून चौकशी करावी व सत्तर लाख खर्चून पेयजल योजनेचे अपूर्ण काम कधी कधी पूर्ण होणार याची लेखी हमी द्यावी.
यामागणीसाठी वालवटी पाणी पुरवठा कमिटीतर्फे अध्यक्ष यशवंत पाटील, उपाध्यक्ष इन्तिखाब मुकरी सचीव शब्बीर खतीब, सदस्य नजीर नाखवाजी, सर्व समाज, ग्रामस्थ व महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून परेश नाका ते पंचायत समिती पर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांना मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले.
कार्यालयासमोर ठेकेदाराला शिक्षा झाली पाहिजे, वालवटी ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे, पाणी आताच सोडा नाही तर याठिकाणी मरुन जाऊ घोषणांनी महिलांनीही आक्रोश केला होता. आणि पाणी पुरवठा कमिटी अध्यक्ष यशवंत पाटील उपाध्यक्ष इन्तिखाब मुकरी सचीव शब्बीर खतीब, शौकत नाखवाजी, शैलेश पाटील, नजीर नाखवाजी सहकारी यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, उपतालुकाप्रमुख मनोज कमाने, आरपीआयचे तालुका अध्यक्ष अॅड. बबन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर, बाबू सुर्वे, ज्ञानेेशर फलेभाई, रविकुमार मुंबईकर, आजीम हुर्जुक, शैलेश पाटील, साजीद कळवसकर, अर्शद मुकरी, मकबुल खतीब, नजीर नाखावजी,मनोज पाटील, मुबश्शीर फकी, जुनेद रामराजकर, सिराज बोदले, आब्दन नाखवाजी आदिंसह शेकडो महिला यावेळी उपस्थित होत्या.
मुरुड पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, पाणीपुरवठा उप अभियंता निहाल चवरकर यांनी घटनास्थळी येऊन उपोषणकर्त्यांच्या तीनही मागण्या मान्य केल्या. यावेळी पाणी पुरवठ्यात काढण्यात आलेले ४४ लाखाचे टेंडर रद्द करण्यात येऊन नवीन टेंडर साठी ३० मे रोजी उसरोली ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असल्याचे व जून अखेरपर्यंत प्रशासकीय कार्यवाही करण्यात आली दलित वस्तीमध्ये कोणतेही काम न करता लाखोंचा अपहरण करणार्यांवर चौकशी करण्याचे लेखी पत्र व ओशासन देण्यात आल्याने वालवटी पाणी पुरवठा कमिटीतर्फे सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.