कंडटर तुटून विद्युत प्रवाहित लाईन खाली पडल्याने , माणगाव येथे माळरानावर चार गुरांचा मृत्यू

By Raigad Times    24-May-2025
Total Views |
 mangoan
 
माणगांव | माणगाव तालुयातील भाले ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या चांदेवाडी व बोंडशेत गावच्या मध्यात २१ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह झालेल्या वादळं पावसामुळे कांदळगाव ते कोलाड अशी जाणारी महावितरणची हायटेन्शन लाईन कंडटर तुटून विद्युत प्रवाहित लाईन खाली माळरानावर पडल्याने चरणार्‍या चार गुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
 
यामध्ये चांदेवाडी गावचे शेतकरी महादेव सोनू आंबेकर यांचे शेती कामाचे दोन बैल तसेच चांदेवाडी गावाचे ग्रामस्थ अनंत पांडुरंग शिगवण यांची गाभण गाय व बोंडशेत गावचे शेतकरी दीपक गोविंद चव्हाण यांची गाभण गाय अशा जनावरांचा समावेश आहे. घटनेची माहिती महावितरण ला देताच विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. २२ मे रोजी घटनास्थळी माणगाव पोलीस, माणगाव महावितरण अधिकारी व कर्मचारी, माणगाव वन अधिकारी व कर्मचारी तसेच भाले सरपंच दत्ताराम खांबे, ग्रामसेवक राहुल ठाकूर, मराठी उद्योजक उपेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते सागर खानविलकर व स्थानिक ग्रामस्थ यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला आहे.
 
शेतकर्‍यांना येन शेतीच्या कामाच्यावेळी मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. यामध्ये महावितरणचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. असे आरोप चांदेवाडी व बोंडशेत गावातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केला आहे. तसेच या नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना लवकरात लवकर आणि योग्य मदत महावितरण कंपनी व शासनाकडून मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी भाले सरपंच खांबे, सामाजिक कार्यकर्ते सागर खानविलकर व उपेंद्र जाधव तसेच स्थानिक ग्रामस्थ संतोष जागडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. घटनास्थळी महावितरणचे सहायक अभियंता एस.बी. सोननीस यांनी पंचनामा केला आहे. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आम्ही पंचनामा करून वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सुपूर्द करणार आहोत संबंधित निर्णय कंपनी प्रशासन घेईल.