खोपोली | मे महिन्यातच पावसाला सुरूवात झाल्यामुळे पावसाळी हंगामातील पिकांच्या तयारीसाठी खालापूर तालुयातील शेतकर्यांकडून शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. नांगरणी, कोळपणीसह अन्य कामांची शेतकर्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे. मात्र सायंकाळ होताच पावसाचे अगमन होत असल्यामुळे शेतकरी वर्गांची तारांबळ उडत आहे. गेल्या वर्षी बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला होता. यावर्षी काय होणार याची सर्वांना आस लागली आहे.
गेल्या वर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने याचा मोठा परिणाम शेती व इतर व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झाल्याचा दिसून आला होता. त्यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पडलेल्या पावसामुळे शेतीसाठी बी-बियाणे, औषधे, खते, मेहनत यावर मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचा खर्च झाला होता.
पाऊस अती पडल्याने जोमात आलेली पिकांची नासधूस झाल्याने झालेला एवढा मोठा खर्च शेतकर्यांचा वाया गेला, त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात गेल्या वर्षी सापडला होता. या वर्षी पावसाचे अगमन लवकर होणार असून असा अंदाज वेध शाळेनी दर्शविला असल्यामुळे या हंगामाच्या पिकाच्या तयारीसाठी शेतांची नांगरणी खुरपणी, बांधावरील गवत पेटवणे, शेणखत शेतात पसरवणे, जमिन भुसभुशीत करणे या अशी विविध कामे सुरू आहेत. यामुळे शेतकर्यांच्या शेतीची मशागत करण्यामध्ये वेग वाढला आहे. या वर्षी येणार्या पावसाचे रुप कसे असणार? याकडे सर्व शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.