अवकाळी पावसाने उन्हाळी भातशेती झोडपली , शासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी; शेतकर्‍यांची मागणी

By Raigad Times    23-May-2025
Total Views |
 pen
 
पेण | पेण तालुयातील शेतकरी हेटवणे धरणाच्या पाण्यावर उन्हाळी भातशेती मोठी प्रमाणात करत आहेत. उन्हाळी भात चांगल्या प्रकारे होत असल्याने अनेक शेतकरी उन्हाळी भातशेतीकडे वळले आहेत. शेतकर्‍यांना पावसाळी भात शेती करण्यापेक्षा उन्हाळी भात शेतीवर खर्च कमी लागत असल्याने व नुकसानसुद्धा कमी होत असल्याने शेतकरी उन्हाळी भातशेती करण्याकडे कल जास्त आहे.
 
परंतु गेल्या दोन तीन आठवड्यापासून अवकाळी पावसाने तयार झालेली भातशेती आडवी केल्याने आलेला हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. भातशेती चांगली बहरली होती, परंतु अचानक सोसाट्याचा वार्‍यासह अवकाळी पाऊस बरसल्याने तयार झालेली भातशेती वार्‍याने आडवी केल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.
 
काही शेतकर्‍यांनी तयार झालेली भात शेती कापून ठेवली होती तर काही भातशेती कापण्याच्या तयारीत होते. परंतु अचानकपणे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याचे शेतकर्‍यांकडून बोलले जात आहे. त्यामुळे शासनाने शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांना कडून होत आहे. पेण तालुयातील हेटवणे धरणाच्या कालव्यातून अनेक गावांना सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे.
 
या पाण्यावर पूर्व भागातील अनेक शेतकर्‍यांकडून उन्हाळी भातशेत पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग कालव्याच्या पाण्याचा फायदा घेत उन्हाळी भातशेती मोठ्या प्रमाणावर करत आहेत. तालुयातील कामारली, तळवली, आधारने, सापोली, शेणे, बोरगाव, काही खारेपाट विभागामधील या भागात सध्या शेतकरी उन्हाळी भातशेती करीत आहेत.
 
तालुयातील कृषि विभागाच्या अंतर्गत ६ हजार ६६८ हेटर क्षेत्रात पैकी १ हजार ७०० ते १ हजार ८०० हेटर उन्हाळी भाताची लागवड केली जात आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना हेटवणे धरणाच्या कालव्यामुळे उदरनिर्वासाठी मोठा आधार मिळत आहे. पावसाळ्यातील शेतीपेक्षा उन्हाळ्यातील शेतीमध्ये जास्त फायदा होत असतो. पावसाळ्यामध्ये रोगराई तसेच अतिवृष्टी, पूर यांचा शेतकर्‍यांना सामना करावा लागतो. कधी कधी अवकाळी पावसामुळे कापणीला आलेले भात कुजून वाया जाते तर कधी पाऊस गायब झाला तर उभे पीक करपून जाते. त्यामुळे उन्हाळी शेती करण्याकडेच मोठा कल आहे परंतु अवकाळी पावसाने उन्हाळी भातशेती झोडपल्याने मोठे नुकसान झाले आहे.
भातशेतीचे नुकसान
उन्हाळी भातशेतीची लागवड करण्यात आली होती, परंतु वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाल्याने तयार झालेली भातशेती आडवी झाल्याने खुप नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने नुकसानभरपाई ध्यावी. -शेखर ऐत, प्रगतशील शेतकरी, वाक्रुळ-पेण